शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या कामांची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:29 IST

पेठ : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने पेठ तालुक्यात पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या शेतकामांना वेग आला असून, भात बियाणाची पेरणी सुरू झाली आहे.

पेठ : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्ताने पेठ तालुक्यात पहिलाच पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या शेतकामांना वेग आला असून, भात बियाणाची पेरणी सुरू झाली आहे. तालुक्यात साधारण १४५ गावांत खरीप हंगामात भात, नागली, वरी, तूर, उडीद हीपिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यात खरीप पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र २३ हजार ६३९ हेक्टर असून, सन २०१९-२० या आर्थिक वर्षात पड क्षेत्रात कृषी विभागाकडून आदिवासी उपयोजनेतून झालेल्या क्षेत्र उपचराच्या कामांमुळे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येणार असून, खरीप पिकांमध्ये बदल होऊन खरिपाच्या प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात वाढ होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पेठ कृषी विभागातर्फे खरीप हंगामपूर्व तयारी करण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती केली जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात किमान शारीरिकअंतर ठेवून गावबैठका व शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहेत.सदर गावबैठकांतर्गत खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासंदर्भात बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, सामूहिक रोपवाटिका तयार करणे, चार सूत्री भात लागवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड/रोग व्यवस्थापन, शेतकरी गट बांधणी करणे, पीकविमा काढणेसंबधी शेतकरी बैठकाद्वारे मार्गदर्शन व जनजागृती केली जात आहे.-------------------कृषिनिविष्ठा खरेदी करताना विक्री केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित खताची मागणी नोंदविणे व संबंधित गटामार्फत शेतकरी बांधवांना थेट बांधावर निविष्ठा पुरवठा करण्याबाबत नियोजन सुरू असून, आजपर्यंत १२६ गटांच्या माध्यमातून ४७० क्विंटल बियाणे व ७१५ टन खताचा पुरवठा थेट बांधावर करण्यात आला आहे.यंदा मान्सून समाधानकारक असल्याने व शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पेठ तालुक्यात२६ गावांत भात पिकाच्या शेतीशाळा घेण्याचे नियोजनअसून, शेतीशाळेत प्रामुख्याने महिला शेतकºयांचा सहभाग घेण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.---------------------तालुक्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ९० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन असून, त्याअंतर्गत प्रत्येकी १० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाचे ४, नागली पिकाचे ४ तर उडीद पिकाचे २ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकºयांना बियाणे, खते व औषधे इत्यादी निविष्ठा पुरवल्या जाणार आहेत.- अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक