शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

ग्रामीण शहरी असमतोलाने चीन, पाकिस्तानची गरजच नाही : पोपटराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:43 AM

जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे.

नाशिक : जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या मनात शहरी नागरिकांविरोधी व शहरी नागरिकांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांविरोधात असंतोष निर्माण होत असून, ही असमतोलाची स्थिती लवकरात लवकर सावरली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांची गरज उरणार नाही असे परखड मत आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.  रावसाहेब थोरातसभागृहात नाशिक रोटरी क्लबतर्फे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय क ार्यासाठी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा चेअरमन विलास शिंदे यांचा शुक्रवारी (दि. २२) नाशिक भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजीमंत्री विनायकदादा पाटील, दिलीपसिंह बेनीवाल आदी उपस्थित होते. पोपटराव पवार म्हणाले, देशाच्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर काळात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, सामाजिक सद््भावना यांसारखे विविध प्रश्न आजही कायम आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील उत्पन्नाचे स्रोत संपले असून, शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भाग विभागले गेले असून, शेती व शेतकºयांच्या प्रश्नांवर तोडगा काढून ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्था समतोलात वाढली नाही, तर देशाला चीन व पाकिस्तानसारख्या शत्रूंची गरजच उरणार नाही, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला, तर वनाधिपती विनायकदादा पाटील, विलास शिंदे यांना मिळालेला पुरस्कार हा शेती क्षेत्राचाच सन्मान असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक श्रीनंदन भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मराठे यांनी केले, तर मनीष चिंधडे यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी