आरटीई शाळा नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:46+5:302021-02-13T04:15:46+5:30

नाशिक : आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ प्रवेशासाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू असून यापूर्वी देण्यात आलेली मुदत १० फेब्रुवारीला ...

RTE school registration deadline extended till February 15 | आरटीई शाळा नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

आरटीई शाळा नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

नाशिक : आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ प्रवेशासाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू असून यापूर्वी देण्यात आलेली मुदत १० फेब्रुवारीला संपल्याने शाळांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोमवार (दि.१५)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी चारपर्यंत ४४५ शाळांनी नोंदणी केली असून शाळांमध्ये ४ हजार ५२० जागा उपलब्ध असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यानुसार खासगी शाळांतील २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. आगामी शैक्षणिक वर्षात या जागांवरील प्रवेशाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी शाळा नोंदणी सुरू आहे. आरटीई अंतर्गत मागील वर्षी जिल्ह्यात ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५५७ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज प्राप्त झाले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार सुरुवातीला पात्र शाळांना नोंदणीसाठी २१ ते ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यात १० फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत शाळांना मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या शाळांची नोंदणीची पडताळणी गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी, मुख्याध्यापक स्तरावर होणार आहे. दरम्यान, दर वर्षाच्या तुलनेत शाळा नोंदणीचे प्रमाण जवळपास पूर्ण झाल्याने लवकरच ऑनलाइन प्रवेश अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संभाव्य वेळापत्रकात बदल होणार असून लवकरच सुधारित वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: RTE school registration deadline extended till February 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.