शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशप्र्रक्रिया संशयाच्या घेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:04 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटे पत्ते व चुकीचे अंतर नमूद केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर असाच आणखी एक प्रकार एका पालकाने गुरू गोविंदसिंग स्कूलमधील पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिला होता.

नाशिक : आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटे पत्ते व चुकीचे अंतर नमूद केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर असाच आणखी एक प्रकार एका पालकाने गुरू गोविंदसिंग स्कूलमधील पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिला होता.आठ दिवसांचा कालावधी होऊनही या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसून संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेशही अबाधित आहे. त्यामुळे तक्रार करणाºया पालकाने पडताळणी समिती व तक्रार निवारण समिती विरोधात थेट शिक्षण उपसंचालकांकडे लेखी तक्रार केल्याने आरटीई प्रवेशप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली आहे.आरटीई अंतर्गत पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांना प्रवेश अर्जात खोटे पत्ते तसेच खोटे अंतर नमूद केल्याचे पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर निदर्शनास आले आहे.विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घराचे प्रत्यक्षातील अंतर आणि अर्जावरील अंतर यात फरक दिसून येत  आहे. पहिल्या सोडतीतून वंचित राहिलेल्या पालकांनी हा मुद्दा उपस्थित करत मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर देवरे यांनी लक्ष घालण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या अर्जावर कोणताही निर्णय झाला नाही.कारवाईकडे पालकांचे लक्षतक्रारकर्ते पालक संदीप पाटील यांनी पडताळणी समिती व तक्रार निवारण समितीच्या विरोधात थेट शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्याने संपूर्ण आरटीई प्रक्रियाच संशयाच्या घेºयात सापडली असून, या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांक डून काय कारवाई होणार याकडे प्रतीक्षेत असलेल्या पालकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा