शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आरटीईची दुसरी राज्यस्तरीय सोडत जाहीर ; पालकांना सोमवारी मिळणार एसएमस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 7:02 PM

आरटीई प्रवेशप्रक्रियेची लांबलेली दुसरी राज्यस्तरीय सोडत शनिवारी (दि.१५) पुण्यातून काढण्यात आली आहे. मात्र या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात सोमवारी एसएमएसद्वारे ही माहिती उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे माहिती न मिळणाºया पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा क्रमांक टाकून खात्री करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

ठळक मुद्देआरटीई प्रवेशाची दुसरी राज्यस्तरीय सोडत जाहीरसोमवारपासून एसएमएसद्वारे मिळणार माहिती

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेची लांबलेली दुसरी राज्यस्तरीय सोडत शनिवारी (दि.१५) पुण्यातून काढण्यात आली आहे. मात्र या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना यासंदर्भात सोमवारी एसएमएसद्वारे ही माहिती उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे माहिती न मिळणाºया पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा क्रमांक टाकून खात्री करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत जिल्ह्यातील तीन हजार ५१७ विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. मात्र पहिल्या फे रीअंती केवळ दोन हजार ४८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित तीन हजार २५१ जागांसाठी तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर दुसरी सोडत काढण्यात आली. या सोडतीचा तपशील सोमवारी जाहीर केला जाणार आहे. अशाप्रकारे सोडत जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा तपशील जाहीर करूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेत खोटे पत्ते, एकच विद्यार्थ्याच्या नावाचे व पत्त्याचे दोन वेगवेगळ्या जन्मतारखांचे अर्ज सोडतीत निवडले गेले होते. विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत प्रवेशही झाले आहेत. त्यामुळे अशाप्रक ारे सोडत जाहीर करण्याच्या प्रक्रियेविषयी पालकांमधून साशंकता व्यक्त होत असताना दुसरी सोडतही याचपद्धतीने काढण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचे पालक  या सोडतीच्या प्रतीक्षेत होते.  त्यांची प्रतीक्षा संपली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ४५७ शाळांतील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या फेरीत २ हजार ४८४ जागांवर प्रवेश झाले असून, उर्वरित तीन हजार ५१७ जागांवर दुसºया फेरीत प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.  आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर काढण्यात येणारी सोडत या वर्षापासून राज्यस्तरावर काढण्यात येत आहे. तसेच मागील वर्षी सात सोडतींमध्ये झालेली ही प्रक्रिया यंदा चार सोडतींमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, दुसरी सोडत जाहीर होण्यातच अर्धा जून उलटल्याने आरटीईची प्रवेशप्रक्रिया पूर्ण कधी होणार? असा सवाल उपस्थित करतानाच किमान दुसरी फेरी कोणत्याही गोंधळाशिवाय लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा प्रतीक्षेत असलेल्या पालकांकडून व्यक्त होत आहे.