शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मदत करावी - अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 17:11 IST

हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत.

बाजीराव कमानकर

सायखेडा (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या द्राक्ष, कांदा, गहू यासह भाजीपाला पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत सरकारने करावी. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत सरकारला धारेवर धरणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी दिली. चांदोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अनिल कदम, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, चांदोरीचे सरपंच विनायक खरात माजी सरपंच संदीप टर्ले, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, खंडू बोडके यासह शेतकरी उपस्थित होते.

चांदोरी येथील बाळासाहेब आहेर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी केली. कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्ष बागेसह कांदा, गहू व भाजीपाला या पिकांचीही पाहणी करत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती जाधव, सुलभा पवार, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, बीडीओ संदीप कराड, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढेमसे, सोमनाथ बस्ते, संजय भोज, दौलत टरले, प्रवीण कोरडे, संजय कोरडे, रवी आहेर, विष्णू कोरडे, अमर आहेर, अभिजित शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.कांदा उत्पादकांची थट्टा

दानवे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देऊन थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तरीही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसून डिसेंबरमध्ये जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची टीका करत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

टॅग्स :NashikनाशिकAmbadas Danweyअंबादास दानवे