शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मदत करावी - अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 17:11 IST

हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत.

बाजीराव कमानकर

सायखेडा (जि. नाशिक) : निफाड तालुक्यात सलग चार दिवस अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या द्राक्ष, कांदा, गहू यासह भाजीपाला पिकांचे तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत सरकारने करावी. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून वाचविण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे घालणार आहोत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत सरकारला धारेवर धरणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी दिली. चांदोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अनिल कदम, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, चांदोरीचे सरपंच विनायक खरात माजी सरपंच संदीप टर्ले, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, खंडू बोडके यासह शेतकरी उपस्थित होते.

चांदोरी येथील बाळासाहेब आहेर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी केली. कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्ष बागेसह कांदा, गहू व भाजीपाला या पिकांचीही पाहणी करत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा भारती जाधव, सुलभा पवार, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, बीडीओ संदीप कराड, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढेमसे, सोमनाथ बस्ते, संजय भोज, दौलत टरले, प्रवीण कोरडे, संजय कोरडे, रवी आहेर, विष्णू कोरडे, अमर आहेर, अभिजित शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.कांदा उत्पादकांची थट्टा

दानवे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देऊन थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. तरीही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे घेणे नसून डिसेंबरमध्ये जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची टीका करत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

टॅग्स :NashikनाशिकAmbadas Danweyअंबादास दानवे