शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

महापालिकेकडून १४ कोटी रुपयांची तरतूद साडेचार महिन्यांचा कालावधी शिल्लक दिव्यांगांसाठी निधी खर्चाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:01 AM

दिव्यांगांसाठी राखून ठेवण्यात आलेला ३ टक्के निधी इतर प्रयोजनार्थ न वळविता, नागरी भागातील दिव्यांगांसाठीच खर्च करण्याचे शासनाने महापालिकेला अनिवार्य केले

ठळक मुद्दे१४ कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हानलेखा विभागाकडून हिरवा कंदील नाहीएकाही प्रस्तावाला चालना नाही

नाशिक : दिव्यांगांसाठी राखून ठेवण्यात आलेला ३ टक्के निधी इतर प्रयोजनार्थ न वळविता, नागरी भागातील दिव्यांगांसाठीच खर्च करण्याचे शासनाने महापालिकेला अनिवार्य केले असून, सदर निधीचे पुनर्विनियोजन अथवा रद्दही करता येणार नसल्याने ज्या वर्षासाठी निधी राखीव ठेवला असेल, त्याच वर्षात तो नमूद प्रयोजनांसाठी खर्च करण्याचे आवश्यक करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महापालिकेपुढे साडेचार महिन्यांत सुमारे १४ कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, महापालिकेने गेल्या चार महिन्यांत अपंगांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, अद्याप एकाही प्रस्तावाला लेखा विभागाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.मागील महिन्यात २४ आॅक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येणाºया ३ टक्के निधी खर्चाच्या अंमलबजावणीवर चर्चा होऊन निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, सदर निधीचे पुनर्विनियोजन करता येणार नाही व निधी रद्दही करता येणार नाही. ज्या वर्षासाठी निधी राखीव ठेवला तो त्याच वर्षात नमूद प्रयोजनांसाठी खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर विषय हाताळण्यासाठी महापालिकेतील एका उपआयुक्तावर जबाबदारी सोपविण्याचेही निर्देश आहेत. याशिवाय, राखीव निधीच्या वापराबाबतचा आढावा दरवर्षी मे, आॅगस्ट, नोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यांच्या १५ तारखेपर्यंत घेऊन त्याचा अहवाल महिन्यातील ३० तारखेपर्यंत नगर विकास विभागाला सादर करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेत विदर्भातील आमदार बच्चू कडू यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आयुक्तांनी तातडीने पावले उचलत अपंग पुनर्वसनासाठी १८ कलमी कृती आराखडा तयार केला. त्यात प्रामुख्याने, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, स्वयंरोजगारासाठी अनुदान, वाचनालये, घरकुलांसाठी अर्थसहाय्य, वैद्यकीय विमा, व्यवसायासाठी गाळे, संसारोपयोगी साहित्य आदी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अंदाजपत्रकात १३ कोटी ४९ लाख १६ हजार रुपयांची अंदाजित तरतूद करण्यात आली. दिव्यांगांसाठी पुरविण्यात येणाºया सोयी-सुविधांची जबाबदारी त्या-त्या खातेप्रमुखांकडे सोपविण्यात आली. त्यानुसार, काही आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण विभागाकडून प्रस्तावही दाखल होत आहेत. परंतु, अद्याप एकाही प्रस्तावाला पुढे चालना मिळालेली नाही. शासनाच्या निर्देशानुसार, महापालिकेला चालू आर्थिक वर्षात राखीव ठेवण्यात आलेला सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मार्च २०१८ अखेर खर्च करण्याचे आव्हान आहे. आतापर्यंत महापालिकेने केवळ अपंगांचे सर्वेक्षण पूर्ण करून त्यांची विभागनिहाय वैद्यकीय शिबिरे घेण्याची तत्परता दाखविलेली आहे. शहरात सुमारे ७५०० दिव्यांग आढळून आले आहेत.