शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

रिपाइं 5 राज्यात निवडणूक लढवणार, आठवलेंनी भाजपला सांगितला सत्तास्थापनेचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:43 IST

लोककवी दिवंगत विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते.

नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मन मोठे करून शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊन सत्तेत सहभागी व्हावे व पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

लोककवी दिवंगत विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत राहणार असून, उत्तर प्रदेशात बसपाचा जनाधार कमी झाला आहे. तेथे रिपाइंला संधी असल्यामुळे आम्ही काही जागांवर निवडणूक लढविणार आहोत. भाजपने रिपाइंला ८ ते १० जागा द्याव्यात यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही आठवलेंनी म्हटले. 

भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन 5 वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री द्यावा. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा मार्ग अवलंबला पाहिजे. याबाबत भाजपला विनंती करणार आहे. भाजप शिवसेना एकत्र येईल असा प्रस्ताव मांडणार असल्याचे आठवले यांनी यापूर्वीही पुण्यात बोलताना म्हटले होते. त्यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले. त्याबरोबरच राज्यपाल, महाविकास आघाडी, अशा विविध मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली होती. 

'गो महाविकास आघाडी गो'

'गो कोरोना गो' ही घोषणा जगभर गाजली. आता ओमायक्रॉन आला असला, तरी त्याचा प्रभाव फारसा नाही. त्यामुळे यापुढील काळात माझा नारा 'गो महाविकास आघाडी गो' असा असणार आहे. तीन चाकांचे हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांना अजून मदत नाही. दलितांना सुविधा मिळत नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये तरतूद करावी असंही आठवलेंनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक