शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:19 IST

कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.

ठळक मुद्देशेकडो हातांना काम : राज्यात नाशिक पॅटर्न चर्चेत

नाशिक : कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.कोरोनाचा फटका गावोगावच्या महिला बचतगटांनाही बसला असून, त्यांच्याकरवी तयार केल्या जात असलेल्या गृहोपयोगी वस्तूंनाही मागणी नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत बचत गटाच्या महिलांना आठवड्याकाठी भरावे लागणारे बचत गटाचे शुल्क कोठून आणावे? असा प्रश्न निर्माण झाला असून, काही महिलांनी बचतगटांकडून कर्ज घेतलेले असल्याने त्यांनाही कर्ज फेडायची चिंता वाटू लागली आहे. या सर्व बाबींची विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना व महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाची सांगड घालून महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोहयोचे काम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्याने त्याची सुरुवात येवला तालुक्यापासून करण्यात आली आहे.गावोगावच्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील महिला बचत गटांना या योजनेविषयी अवगत केल्यानंतर येवला तालुक्यातील पाटोदा, शिरसगाव लौकी, पारेगाव, चिंचोडी, रायते, अंगुलगाव, नांदूर या गावातील बचत गटातील महिलांना रोहयोच्या कामासाठी पुढाकार दर्शवून आपल्या बचतगटाची नोंद ग्रामपंचायतीच्या कामासाठी केली आहे. सध्या या सहाही गावामध्ये रोहयोच्या समूह गटाच्या कामासाठी महिला बचत गटाने सुरुवात केली असून, गावातील तलावाचे काम काढण्याचे अकुशल कामे त्यांच्याकडून करवून घेतली जात आहेत.या कामासाठी दररोज या महिलांसाठी गाळ काढण्यासाठीचे मार्किंग करून दिले जात असून, दिवसभरातून त्यांनी किती कामकाज केले त्याचे सायंकाळी मोजमाप केले जाते. त्या कामाच्या प्रमाणात त्यांना त्याचा मेहनताना अदा केला जात आहे.रोहयोच्या कामासाठी प्रत्येकी २२७ रुपये मेहनताना शासनाने निश्चित केलेला असला तरी, महिलांच्या कार्यक्षमतेवर त्यापेक्षाही अधिक शुल्काचे काम करून महिलांकडून तीनशे ते चारशे रुपयांचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या या कामासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे, तोंडाला मास्क वापरण्याचे त्याचबरोबर काम आटोपल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची व्यवस्थाही केली जात आहे.जॉबकार्ड तयार करण्याचे काम सुरूग्रामीण भागातील महिलांना रोहयोतून काम मिळू लागल्याचे पाहून येवला तालुक्यातील महिला बचतगटाच्या सुमारे चारशे ते पाचशे महिलांनी रोहयोच्या कामासाठी आपली नोंदणी केली असून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्यांचे जॉबकार्ड तयार करण्याचे काम केले जात असल्याची माहिती तालुका समन्वयक दीपिका जैन यांनी दिली आहे, तर महिला बचतगटातील महिलांना अधिकाधिक कामे देण्यासाठी गटविकास अधिकारी उमेश देशमुख प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या