शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:19 IST

कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.

ठळक मुद्देशेकडो हातांना काम : राज्यात नाशिक पॅटर्न चर्चेत

नाशिक : कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कामात येवला तालुक्याने मोठी मजल मारली असून, सहा ग्रामपंचायतींनी बचत गटातील जवळपास दोनशे ते तीनशे महिलांच्या हाताला गेल्या काही दिवसांपासून काम दिले आहे.कोरोनाचा फटका गावोगावच्या महिला बचतगटांनाही बसला असून, त्यांच्याकरवी तयार केल्या जात असलेल्या गृहोपयोगी वस्तूंनाही मागणी नसल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत बचत गटाच्या महिलांना आठवड्याकाठी भरावे लागणारे बचत गटाचे शुल्क कोठून आणावे? असा प्रश्न निर्माण झाला असून, काही महिलांनी बचतगटांकडून कर्ज घेतलेले असल्याने त्यांनाही कर्ज फेडायची चिंता वाटू लागली आहे. या सर्व बाबींची विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजना व महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाची सांगड घालून महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोहयोचे काम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्याने त्याची सुरुवात येवला तालुक्यापासून करण्यात आली आहे.गावोगावच्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील महिला बचत गटांना या योजनेविषयी अवगत केल्यानंतर येवला तालुक्यातील पाटोदा, शिरसगाव लौकी, पारेगाव, चिंचोडी, रायते, अंगुलगाव, नांदूर या गावातील बचत गटातील महिलांना रोहयोच्या कामासाठी पुढाकार दर्शवून आपल्या बचतगटाची नोंद ग्रामपंचायतीच्या कामासाठी केली आहे. सध्या या सहाही गावामध्ये रोहयोच्या समूह गटाच्या कामासाठी महिला बचत गटाने सुरुवात केली असून, गावातील तलावाचे काम काढण्याचे अकुशल कामे त्यांच्याकडून करवून घेतली जात आहेत.या कामासाठी दररोज या महिलांसाठी गाळ काढण्यासाठीचे मार्किंग करून दिले जात असून, दिवसभरातून त्यांनी किती कामकाज केले त्याचे सायंकाळी मोजमाप केले जाते. त्या कामाच्या प्रमाणात त्यांना त्याचा मेहनताना अदा केला जात आहे.रोहयोच्या कामासाठी प्रत्येकी २२७ रुपये मेहनताना शासनाने निश्चित केलेला असला तरी, महिलांच्या कार्यक्षमतेवर त्यापेक्षाही अधिक शुल्काचे काम करून महिलांकडून तीनशे ते चारशे रुपयांचे काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या या कामासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे, तोंडाला मास्क वापरण्याचे त्याचबरोबर काम आटोपल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची व्यवस्थाही केली जात आहे.जॉबकार्ड तयार करण्याचे काम सुरूग्रामीण भागातील महिलांना रोहयोतून काम मिळू लागल्याचे पाहून येवला तालुक्यातील महिला बचतगटाच्या सुमारे चारशे ते पाचशे महिलांनी रोहयोच्या कामासाठी आपली नोंदणी केली असून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून त्यांचे जॉबकार्ड तयार करण्याचे काम केले जात असल्याची माहिती तालुका समन्वयक दीपिका जैन यांनी दिली आहे, तर महिला बचतगटातील महिलांना अधिकाधिक कामे देण्यासाठी गटविकास अधिकारी उमेश देशमुख प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या