रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वैतागले वाहनचाल

By Admin | Updated: November 16, 2015 21:23 IST2015-11-16T21:22:13+5:302015-11-16T21:23:16+5:30

कसर्व्हिस रस्त्याची दुरवस्था : तात्पुरत्या डागडुजीमुळे समस्येत वाढ

Roads in the road due to potholes | रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वैतागले वाहनचाल

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वैतागले वाहनचाल

पाथर्डी फाटा : फाळके स्मारकासमोरील आणि गरवारे पॉइंट येथील सर्व्हिस रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक वैतागले असून, हे खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे खड्डे बुजवले जाण्याऐवजी रस्त्याची परिस्थिती अधिक खराब झाल्यामुळे या समस्येत भर पडली आहे.
फाळके स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर सर्व्हिस रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथून जाताना वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वाहनांचे नुकसान तर होतेच, शिवाय मान व पाठीचे दुखणेही वाढले असून, इच्छित स्थळी वेळेवर पोहोचणेही मुश्किल होत असल्याचे त्रस्त वाहनचालकांनी सांगितले.
मुंबईकडून शहरात प्रवेश करण्यासाठी गरवारे पॉइंट येथील सर्व्हिस रस्त्याचा वाहनचालक उपयोग करतात. मात्र महामार्गावरून खाली प्रवेश करतेवेळीच वाहनचालकांचे स्वागत हे मोठे खड्डे करतात. हे खड्डे टाळण्याच्या नादात अनेक वेळा अपघातजन्य परिस्थिती उद्भवते. पाठीमागून येणारी वाहने पुढच्या वाहनांवर आदळल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. पुढे आल्यावर गरवारे पॉइंट चौफुलीवरही असलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान तर होतेच शिवाय वाहने सावकाश पुढे नेताना वाहतूक कोंडीही होते. हा त्रास टाळण्यासाठी काही वाहनचालक उड्डाणपुलावरून वाहने पुढे नेऊन आॅडी शोरूमसमोरच्या रॅम्पवरून उलटदिशेने सर्व्हिस रस्त्यावर उतरवतात जे अतिशय धोक्याचे असून, त्यामुळेही अपघातांची शक्यता वाढते. हा रॅम्प नाशिक शहर, द्वारकाकडे किंवा तसेच पुढे जाण्यासाठी उड्डाणपुलाचा उपयोग करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांना महामार्गावर जाण्यासाठी आहे. महामार्गावरून खाली येण्यासाठी त्याची रचनाच नसताना खड्डे टाळण्यासाठी त्याचा उपयोग धोक्याचा ठरतो आहे. (वार्ताहर)

Web Title: Roads in the road due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.