शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ओझर-शिर्डी विमानतळापर्यंतचा रस्ता हरवला खड्ड्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 17:57 IST

सिन्नर-  नावलौकिक मिळालेल्या शिर्डी देवस्थानाला विमानतळ सुुरु करण्यात आले. ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना जोडणारा रस्त्याही बनविण्यात आला. मात्र राज्यमार्गाची वाट लागली असून सदर रस्ता खड्ड्यात हरवल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.

वाहनधारकांना खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागत आहे. ओझर ते वावीपर्यंत रस्त्याची मोठी दूरवस्था झाली असून वावीपासून शिर्डी विमानतळापर्यंत रस्ता सुस्थितीत आहे. ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना जोडला जाणारा राज्यमार्ग (क्र . ३५) हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे तयार झाले असून डांबर व खडी उखडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यात परतीच्या अवकाळी पावसाची भर पडल्यामुळे हा रस्ता एक प्रकारे अपघातास निमंत्रण देत आहे. गुजरात राज्यातील साईभक्तांना नाशिक (पंचवटी) हे तीर्थस्थान करून शिर्डीला येण्यासाठी ओझरमार्गे हा राज्यमार्ग सोयीचा आहे परंतु याच मार्गावर सायखेडा, भेंडाळी, हिवरगाव, वडांगळी, निमगाव देवपूर, पंचाळे आदी गावांजवळ जागोजागी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठ्या अपघातांना हकनाक बळी पडावे लागत आहे. गेल्या आठ वर्षापासून तयार झालेला हा राज्यमार्ग अजूनही मिठसागरे दरम्यान अपूर्ण अवस्थेत आहे. सदर रस्त्याची खडी टाकून डागडुजी करून गैरसोय दूर करावी, अथवा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा