सटाण्यात शेतकऱ्यांनी कांदा फेकला रस्त्यावर
By Admin | Updated: September 10, 2016 00:46 IST2016-09-10T00:46:12+5:302016-09-10T00:46:28+5:30
२५ रुपये क्ंिवटल भाव : सटाणा-मालेगाव मार्गावर दोन तास ठिय्या

सटाण्यात शेतकऱ्यांनी कांदा फेकला रस्त्यावर
सटाणा : उन्हाळ कांद्याच्या भावाची घसरण सुरूच असून, शुक्र वारी
(दि. ९) सटाणा बाजार समिती आवारात पंचवीस रुपये प्रतिक्विंटलने कांदा विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर कांदा फेकून संताप व्यक्त केला. यानंतर ठिय्या देऊन दोन तास सटाणा-मालेगाव मार्ग रोखून धरला.
कांदा भावाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्र वारी सटाणा बाजार समिती आवारात सकाळी साडेदहा वाजता कांदा लिलाव सुरू झाले. सुरुवातीलाच व्यापाऱ्यांनी तीन वाहनांवरील कांद्याचा लिलाव करण्यास नकार दिला, तर चौथ्या वाहनावरील कांदा भाव दोन रुपयांपासून पुकारा करून फक्त पंचवीस रु पये प्रतिक्विंटल भाव दिला. मातीमोल भावाने कांदा विकला गेल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर कांदा फेकून निषेध केला. त्यानंतर चांगल्या कांद्यालादेखील सर्वाधिक दीडशे रु पये क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपला मोर्चा गेट बाहेर वळवून शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून सटाणा-मालेगाव रस्त्यावर ठिय्या देऊन दोन तास वाहतूक रोखून धरली. यावेळी शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब जाधव यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत शेतकऱ्यांना अडत मुक्त केल्यामुळे व्यापारी लूट भावाने कांदा खरेदी करत आहेत.
या लुटीला सरकारचीदेखील मूक संमती असल्याचा आरोप करण्यात आला. पिंगळवाडे येथील शेतकरी रवींद्र चव्हाण यांनी गुरु वारी कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यांना प्रतिक्विंटल सव्वा चारशे रु पये भाव मिळाला होता, तोच कांदा शुक्रवारी विक्रीसाठी आणला असता त्याला केवळ दीडशे रु पये भाव मिळाल्याची खंत व्यक्त करत व्यापारीच कांद्याचे भाव पाडत असल्याचे सांगत शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात लालजी पवार, देवीदास मांडवडे, विक्र म सोनवणे, सुरेश देवरे, मधुकर बच्छाव, जगदीश काकुळते, साहेबराव निकम, दीपक भोसले, अनिल निकम, नितीन मोरे, रवींद्र मोरे, राहुल सूर्यवंशी, रवींद्र चव्हाण, नंदू देवरे, नितीन भामरे, केदा भामरे, विजय सूर्यवंशी, अनिल जाधव, योगेश जाधव, पंकज जाधव, धनंजय जाधव, बंडू सूर्यवंशी, शरद अहिरे, पंडित वाघ यांच्यासह केरसाने, किकवारी, ठेंगोडा, पीळकोस, सावकी, मुंगसे, पिंगळवाडे, ताहाराबाद, अंतापूर, लखमापूर, ब्राह्मणगाव, आराई, सटाणा, मुंजवाड आदी गावातील कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)