शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अंजनेरीच्या राखीव वनात रस्त्याचा घाट

By अझहर शेख | Updated: October 17, 2020 01:07 IST

अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावपासून थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्ताव पश्चिम वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा रस्ता अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाच्या अखत्यारितीतील १७ ते २० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देनैसर्गिक जैवविविधता धोक्यात : मुळेगावपासून गडाच्या माथ्यापर्यंत रस्त्याचा प्रस्ताव

नाशिक : अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावपासून थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्ताव पश्चिम वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा रस्ता अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाच्या अखत्यारितीतील १७ ते २० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अंजनेरी राखीव वनाच्या पूर्वेच्या चतु:सीमेनुसार मौजे मुळेगावापासून तर थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठविला आहे. या रस्त्याचा फायदा केवळ गडावर वाहनांद्वारे जाण्यासाठी भाविकांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गडावर कुठलीही लोकवस्ती नसल्यामुळे याव्यतिरिक्त रस्त्याचा कुठलाही फायदा सर्वसामान्यांना होणार नसल्याचे पर्यावरणप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे. राखीव वन संवर्धन घोषित असतानासुध्दा सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रशासनाकडून रस्त्याच्या प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ५६९.३६० हेक्टर राखीव वनक्षेत्रn नाशिकचे निसर्गवैभव असलेल्या अंजनेरी राखीव वनक्षेत्र हे नैसिर्गक जैवविविधतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थळ आहे. येथील जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने ३१ जानेवारी २०१७ साली अध्यादेश जारी करत नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या पश्चिम भागातील नाशिक वन परिक्षेत्रातील अंजनेरी गडावरील एकूण ५६९.३६० हेक्टर (५ हजार ६९३ चौ.किमी) क्षेत्र ‘राखीव संवर्धन’ म्हणून घोषित केले. या राखीव वनाची जपवणूक होणे गरजेचे असून त्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग