शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ऐतिहासिक हरिहर गडावर मुक्कामाचा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:57 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिहर गड प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देसंवर्धनाचे पाऊल : सह्याद्री प्रतिष्ठानने मुख्य प्रवेश कमानीत बसविला आठ फुटी लाकडी दरवाजा

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिहर गड प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. सूर्यास्तानंतर चोरट्या रस्त्याने मुक्कामासाठी गड चढणाºया हौशी हुल्लडबाजांची वाट आता दरवाजामुळे बंद होण्यास मदत होईल.हरिहर गडाच्या पायथ्याचे गाव हर्षेवाडी आहे. या गडाची चढाई अत्यंत अवघड आहे. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारितीतीत गडाचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या भागात कुºहाडबंदी, चराईबंदीसह बेकायदेशीरपणे प्रवेश करत धूम्रपान, मद्यप्राशन करणे कायदेशीर गुन्हा ठरतो. वनविभागाने गड व वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी हर्षेवाडी गावकऱ्यांची संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीची पूर्वपरवानगी घेत प्रवेश शुल्क भरून सोबत वाटाड्या घेऊनच गडावर पर्यटकांनी जावे, असा नियम वनविभागाकडून करण्यात आला आहे. मात्र गाव झोपी गेल्यानंतर अनेकदा काही हौशी मंडळी गावकºयांची नजर चुकवून रात्रीच्या वेळी हा अवघड व धोकादायक गड चढण्याचा प्रताप करत मुक्काम करतात. सदर प्रकार वनविभाग व स्थानिक त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या निदर्शनास आला होता. हरिहर गडाच्या संवर्धनासाठी पुढे आलेल्या प्रतिष्ठानने मागील पाच महिन्यांपासून येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीत लाकडी दरवाजा बसविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. प्रवेशद्वाराच्या लोकार्पणप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, हर्षेवाडीचे सरपंच नामदेव बुरंगे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....म्हणून वनविभागाने दिला हिरवा कंदीलगडाच्या सुरक्षिततेसह नागरिक व सभोवतालच्या वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने हरिहर गडाचा दरवाजा बसविण्याबाबतचे पत्र उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांना दिले. यानंतर वनविभागाने यामुळे कुठल्याही प्रकारच्या वन कायद्याचा भंग तर होत नाही ना याबाबत खात्री पटविली. यानंतर वनविभाग प्रशासनाकडून गडावर दरवाजा बसविण्याकरिता हिरवा कंदील दाखविला. लोकवर्गणीतून प्रतिष्ठानने सागवान लाकडापासून तयार केलेला आठ फुटी दरवाजा गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीत बसविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहासforest departmentवनविभाग