शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

पितरांच्या स्मरणार्थ विधी ;  आज अमावास्या समाप्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:44 AM

पितृपक्षाचा अखेर अर्थात मातामह श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्येचा अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी शहरात नागरिकांकडून पूर्वजांच्या शांतीप्रीत्यर्थ विधीचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : पितृपक्षाचा अखेर अर्थात मातामह श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्येचा अखेरचा दिवस असल्याने मंगळवारी शहरात नागरिकांकडून पूर्वजांच्या शांतीप्रीत्यर्थ विधीचे आयोजन करण्यात आले आहे.  पितृपक्ष सुरू झाल्यावर पूर्वज पृथ्वीवर येतात तर सर्वपित्री अमावास्येला त्यांना निरोप दिला जातो, अशी धारणा असल्याने या दिवसाला महत्त्व आहे. ज्या पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही, त्यांचे श्राद्ध, पक्ष सर्वपित्री अमावास्येला केले जाते. बुधवारी (दि.१०) नवरात्रास प्रारंभ होणार असून, त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.९) श्राद्ध, पक्ष, तर्पण, दानधर्म आदी करून आपल्या पितरांच्या स्मृती जागविल्या जाणार आहेत. या दिवशी महालयदेखील आहे. या दिवशी पवित्र अशा नद्यांमध्ये स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण केले जाते. नातेवाईक, ब्राह्मण आदींना बोलावून भोजन दिले जाते. याशिवाय गोरगरिबांना अन्न, वस्त्र दान करण्यालाही महत्त्व आहे. यामुळे पित्रांचे आत्मे तृप्त होतात, असे मानले जाते.गंगाघाटावर गर्दीनाशिककरांकडून मंगळवारी श्राद्ध, तर्पण, पक्ष, पिंडदान, नैवेद्य, भोजन, दानधर्म, सामाजिक उपक्रमांद्वारे पितरांचे स्मरण करण्यावर भर दिला जाणार आहे. गंगाघाटावरही पितृपक्षाची गर्दी होणार असून, त्यानुसार प्रशासनाने नियोजन केले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे