शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

शाळा सुरू करण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 21:57 IST

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली असून, अशा स्थितीत नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र : कोरोनाचा सामना करण्यास सक्षम नसल्याचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली असून, अशा स्थितीत नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.शाळा सुरू करायच्या किंवा कसे, याबद्दलचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे अत्यंत गैर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे किंवा कसे, हे सांगण्याचा अधिकार राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाचा आहे. ती जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे धोकादायक ठरू शकेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले असून प्रथम नाशिक आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्तझाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी टीव्ही, वर्कबुक, अ‍ॅक्टिव्हिटी बुक, प्री-लोडेड टॅब अशा सगळ्या पयार्यांचा विचार करण्याची गरज असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या आहे.परंतु, बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ एंड न्यूरो-साइंसेज संस्थेने मोबाइल किंवा आॅनलाइन शिक्षण देणे हे मुलांच्या आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट केल्याचा दाखला देत खासगी शाळांनी सुरू केलेल्या आॅनलाइन शिक्षणाच्या माऱ्यालाही तत्काळ वेसण घालण्याचे आवाहनही मुख्याध्यापक संघाने यापत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केले आहे.वर्कबुक, अ‍ॅक्टिव्हिटी बुक हाच पर्यायराज्यातील १५ टक्के घरात साधा टीव्हीदेखील नाही आणि स्मार्टफोनही ४० टक्के घरात नाही. ही बाब लक्षात घेता वर्क बुक आणि अ‍ॅक्टिव्हिटी बुक हाच पर्याय योग्य ठरू शकतो असा सल्ला मुख्याध्यापक संघाने दिला आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.जुलैअखेरपर्यंत वर्क बुक आणि अ‍ॅक्टिव्हिटी बुक तिमाही पद्धतीने छापून ती राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत घरपोच देण्यात यावीत, तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्री-लोडेड टॅब देणे शक्य असल्यास त्याबाबत शासनाने निर्णय करावा, अशी मागणीही मुख्याध्यापक संघाने केली आहे.शासकीय निर्णयानुसार१ जुलैपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार पालक-शिक्षक संघ कार्यकारिणी व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था आहे. या समित्यांच्या चर्चेतून कोणत्याही ठोस निर्णय घेता येत नाही.-अनिल पवार, मुख्याध्यापक, सारडा विद्यालय, सिन्नर सध्या शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आशा स्थितीत एक जुलैपासून शाळा सुरू करणे योग्य नाही. ही भयानक स्थिती आटोक्यात आल्यानंतरच याबाबत निर्णय घ्यावा, शिक्षक सुटीच्या दिवशीही शाळा चालवून सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतील. मात्र सध्याच्या संकटाला सामोरे जाण्यास मुख्याध्यापक सक्षम नाही.- एस. बी. देशमुख, सचिव,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघसध्याची कोविड १९ चा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत विद्यार्थी शाळेत आल्यास फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन होऊ शकणार नाही. त्यामुळे जुलैपासून शाळा सुरु केल्यास हा प्रादुर्भाव अधिकच वाढण्याची शक्यता असताना शासनाने शाळाला सुरु करण्याचा धोका पत्करू नये.- एस. के. सावंत, अध्यक्ष,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन