शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नांदगावला प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर रिपाइंचे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 10:54 PM

नांदगाव, : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या. यंत्रणेच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने ३० सप्टेंबरला तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देनिवेदन : आमरण उपोषणाचा इशारा

नांदगाव, : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या. यंत्रणेच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने ३० सप्टेंबरला तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर (नाना) जाधव, विलास कोतकर, गौतम काकळीज यांनी याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन धांडे यांनी दिले. निवेदनात म्हटले आहे की, दळणवळण सुलभ व्हावे व जनतेचा शहराशी जनसंपर्क राहावा, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या सब-वेमधील तांत्रीक अडचणी व अतिक्रमणे याबाबत महसूल, पोलीस आणि पालिका प्रशासन या सर्वच प्रशासकीय स्तरावर उदासीनतेची भूमिका असल्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत.

सर्वसामान्य जनतेला वेठीला धरले जात असून, जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. गंभीर रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी चार किमीचा वळसा घालून जावे लागत आहे. या विषयावर महसूल पालिका आणि पोलीस यांच्या पातळीवर धोरणात्मक उपाययोजनांना चालना मिळत नाही, असे दिसून येते त्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.फोटो- २७ नांदगाव निवेदननांदगावचे मुख्याधिकारी विवेक धांडे याना मागण्यांचे निवेदन देताना रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव.

टॅग्स :PoliticsराजकारणGovernmentसरकार