शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विश्वासात न घेतल्याची रिपाइंला खंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:27 IST

रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अशा जागा सोडून रिपाइंला अडचणीत आणले

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षांचा परजिल्ह्यात प्रचार : युतीकडून दुय्यम वागणूकीचा आरोपझेंडा वापरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोठेही स्थान दिले जात नसल्याची खंत

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाला संपूर्ण उत्तर महाराष्टÑात एकही जागा न सोडण्यात आल्याने अगोदरच नाराजी असताना त्यातच महायुतीच्या उमेदवारांकडून निवडणूक नियोजन व प्रचारात रिपाइंच्या नेत्या, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत आहे. त्यामुळेच की काय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी नाशिक जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकडे पाठ फिरवून उत्तर महाराष्टÑातील अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे.

रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अशा जागा सोडून रिपाइंला अडचणीत आणले आहे. नाशिक जिल्ह्यात एकही जागा रिपाइंला मिळू शकली नाही. या पक्षाच्या वतीने देवळाली व पश्चिम मतदारसंघाची मागणी केली गेली, मात्र तीदेखील मान्य करण्यात आली नाही त्यामुळे पक्षाचा अधिकृत एकही उमेदवार नसल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच युतीच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करताना रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले नाही. रिपाइं महायुतीत सहभागी असल्याने भाजपा व सेनेने त्या प्रमाणात रिपाइंला प्राधान्य द्यावयास हवे, मात्र रिपाइंचा फक्त झेंडा वापरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोठेही स्थान दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात भाजप-सेनेकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळेच जिल्हाध्यक्ष प्रकार लोंढे यांनी उत्तर महाराष्टÑातील अन्य जिल्ह्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. जिल्हाध्यक्षच शहरात नसल्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांनीदेखील प्रचारातून अंग काढून घेतले आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारपत्रकात पाहिजे त्या प्रमाणात रिपाइंला स्थान दिले जात नसल्याची तक्रार आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र न लावणे, पक्षाचे नाव न टाकणे, स्थानिक रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून व नियोजनापासून डावलणे असे प्रकार युतीकडून केले जात आहेत. नाशिक शहरात रिपाइंचे मतदान पाहता, पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची जाहीर सभा घेण्याचे ठरत असताना युतीच्या उमेदवारांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असले तरी, त्याविषयी कोणतेही नियोजन केले जात नसल्याचे पाहून पक्षाला व कार्यकर्त्यांना मानसन्मान नसेल तर घरात बसणेच योग्य राहील, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक