शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

रिपाइं तीन जागांसाठी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:43 IST

नाशिक : सेना-भाजप युतीबाबत दोन्ही पक्षांचे नेते जाहीर कार्यक्रमांमधून ठामपणे भूमिका मांडत असले तरी अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्याने ...

नाशिक : सेना-भाजप युतीबाबत दोन्ही पक्षांचे नेते जाहीर कार्यक्रमांमधून ठामपणे भूमिका मांडत असले तरी अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्याने युतीची अनिश्चितता अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून जिल्ह्यातील एक किंवा दोन जागांच्या अदलाबदलीसाठी अनुकूल असल्याची चर्चा असतानाच आता रिपाइंकडून जिल्ह्यातील तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या रिपाइंच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते.महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंला लोकसभा निवडणुकीत एकही जागा देण्यात आली नसली तर नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांना पुन्हा एकदा मंत्रिपद तसेच राज्यात रिपाइंला अविनाश महातोकर यांच्या रूपाने एक मंत्रिपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत रिपाइंला किमान दहा जागा सोडण्याबाबतचा आग्रह आठवले यांनी धरला आहे. मात्र याबाबत अद्याप भाजपाकडून कोणताही शब्द देण्यात आलेला नाही. मात्र रिपाइंने यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत बैठक बोलाविली होती. यावेळी रिपाइंने नाशिकमधील किमान चार जागांवर निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.रिपाइंच्या या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी देवळाली, नाशिक पश्चिम आणि नांदगाव या तीन जागांची मागणी केल्याचे समजते. सेना आणि भाजप यांनी आपापल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी दर्शवावी, अशी मागणी महायुतीच्या बैठकीत करण्यात आल्याची चर्चा यावेळी झाली. दरम्यान, नांदगाव तसेच नाशिक पश्चिम जागेसंदर्भात सेना-भाजपा यांनी यापूर्वीच दावा सांगितल्यामुळे रिपाइंला जागावाटपाच्या चर्चेत कितपत गांभीर्याने घेतले जाईल, याविषयीच शंका आहे. युती संदर्भातील चर्चेनंतरच घटक पक्षांना किती आणि कुणाच्या कोट्यातून जागा द्यायच्या याबाबतची चर्चा होणार आहे.त्यामुळे रिपाइंकडून प्राथमिक स्तरावर चाचपणी करण्यात आली असली रिपाइंच्या वाट्याला जिल्ह्यातील जागा येणार की नाही हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा