शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

रिपाइं तीन जागांसाठी आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:43 IST

नाशिक : सेना-भाजप युतीबाबत दोन्ही पक्षांचे नेते जाहीर कार्यक्रमांमधून ठामपणे भूमिका मांडत असले तरी अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्याने ...

नाशिक : सेना-भाजप युतीबाबत दोन्ही पक्षांचे नेते जाहीर कार्यक्रमांमधून ठामपणे भूमिका मांडत असले तरी अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्याने युतीची अनिश्चितता अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून जिल्ह्यातील एक किंवा दोन जागांच्या अदलाबदलीसाठी अनुकूल असल्याची चर्चा असतानाच आता रिपाइंकडून जिल्ह्यातील तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या रिपाइंच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते.महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंला लोकसभा निवडणुकीत एकही जागा देण्यात आली नसली तर नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांना पुन्हा एकदा मंत्रिपद तसेच राज्यात रिपाइंला अविनाश महातोकर यांच्या रूपाने एक मंत्रिपद देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत रिपाइंला किमान दहा जागा सोडण्याबाबतचा आग्रह आठवले यांनी धरला आहे. मात्र याबाबत अद्याप भाजपाकडून कोणताही शब्द देण्यात आलेला नाही. मात्र रिपाइंने यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत बैठक बोलाविली होती. यावेळी रिपाइंने नाशिकमधील किमान चार जागांवर निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.रिपाइंच्या या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी देवळाली, नाशिक पश्चिम आणि नांदगाव या तीन जागांची मागणी केल्याचे समजते. सेना आणि भाजप यांनी आपापल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी दर्शवावी, अशी मागणी महायुतीच्या बैठकीत करण्यात आल्याची चर्चा यावेळी झाली. दरम्यान, नांदगाव तसेच नाशिक पश्चिम जागेसंदर्भात सेना-भाजपा यांनी यापूर्वीच दावा सांगितल्यामुळे रिपाइंला जागावाटपाच्या चर्चेत कितपत गांभीर्याने घेतले जाईल, याविषयीच शंका आहे. युती संदर्भातील चर्चेनंतरच घटक पक्षांना किती आणि कुणाच्या कोट्यातून जागा द्यायच्या याबाबतची चर्चा होणार आहे.त्यामुळे रिपाइंकडून प्राथमिक स्तरावर चाचपणी करण्यात आली असली रिपाइंच्या वाट्याला जिल्ह्यातील जागा येणार की नाही हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा