शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

टाकेद परिसरात भात पिकावर माव्याचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:54 IST

इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात भात पिकावर मावा रोगाने आक्रमण केल्याने अडचणीत आणखी भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यात भात पिकावर मावा रोगाने आक्रमण केल्याने अडचणीत आणखी भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.दरम्यान, सर्वच पिकांचे प्रशासनाने तत्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी इगतपुरी तालुका प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने इगतपुरी नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे पूर्ण बिल माफ करावे, त्वरित शेतकरी बांधवांना मदतीचा हात द्यावा, शेतकºयांच्या मुलांची शिक्षण फी माफ करावी, नुकसानग्रस्तांना एक महिन्याचे रेशन धान्य मोफत द्यावे आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, शहराध्यक्ष सोपान परदेशी, संतोष मानकर, सुरेश शेलार, वासुदेव भगतआदी उपस्थित होते.पिक पाण्याखालीशेतकºयांची हाता-तोंडाशी आलेली भातशेती, सोयाबीन ही पिके झालेल्या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने कर्ज घेऊन पिकवलेल्या शेतीवर पूर्णपणे पाणी फिरले आहे. अनेकांची सोंगणी करून ठेवलेला भातही पाण्याखाली गेला. तर जनावरांसाठीचा चाराही भिजल्याने जनावरांना काय खाऊ घालावे, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी