शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

परतीच्या पावसाने कांदा, भात पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:22 IST

यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्या गतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला.

ठळक मुद्देबाजरीचे नुकसान : सोयाबीन, उडीद, मूग अडचणीतकांद्यासाठी लावलेली रोपेही पावसाच्या तडाख्याने उघड्यावर येऊन पडले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बुधवारी दुपारनंतर संपूर्ण जिल्ह्याला धुवाधार धुणाऱ्या परतीच्या पावसाने कांदा व काढणीला आलेल्या भात पिकाला मोठा धोका निर्माण झाला असून, हंगामपूर्व द्राक्षांच्या मण्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचलेली पिके तर जवळपास नष्ट झाली असून, या पावसाचा दूरगामी परिणाम होऊन शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्या गतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढलेली असताना पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. अशातच भाद्रपदात उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली असताना शेतकºयांनी कशीबशी पिके वाचविली आहेत. आता पिके काढणीला आलेली असताना बुधवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने जोरदार बरसून संपूर्ण जिल्ह्याला धुवून काढले आहे. अनेक गावांमध्ये शेतात गुडघ्याइतके पाणी साचले असून, काही ठिकाणी उभी बाजरी, मका, कांदा पावसाच्या तडाख्याने जमिनीवर झोपला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात या पिकांना धोका निर्माण झाला आहे. बाजरी जमिनीवर झोपली असून, कणसे भिजली आहेत. तर चाळीत साठवलेल्या कांद्यालाही या पावसाचा फटका बसणार आहे. आर्द्रता वाढल्याने चाळीतील कांदा ओला होऊन त्याच्या सडण्याची प्रक्रिया जोरदार होण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली असून, लेट खरिपाच्या कांद्यासाठी लावलेली रोपेही पावसाच्या तडाख्याने उघड्यावर येऊन पडल्यामुळे संपूर्ण रोपे वाया जाण्याची शक्यता आहे. भाताला हलक्या पावसाची गरज असताना मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून जमिनीखाली असलेला भात बाहेर पडण्याची भीती आहे. विशेष करून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यात भात व नागली पिके या पावसामुळे अडचणीत सापडली असून, काढणीवर आलेले सोयाबीन, उडीद व मूगाच्या शेंगा फुटण्याची शक्यता आहे. या पावसाचा रब्बी पिकांना लाभ होणार असला तरी, असाच पाऊस सुरू राहिल्यास खरिपाची पिके नष्ट होण्याची धास्ती शेतकºयांना आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक