शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने कांदा, भात पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:22 IST

यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्या गतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला.

ठळक मुद्देबाजरीचे नुकसान : सोयाबीन, उडीद, मूग अडचणीतकांद्यासाठी लावलेली रोपेही पावसाच्या तडाख्याने उघड्यावर येऊन पडले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बुधवारी दुपारनंतर संपूर्ण जिल्ह्याला धुवाधार धुणाऱ्या परतीच्या पावसाने कांदा व काढणीला आलेल्या भात पिकाला मोठा धोका निर्माण झाला असून, हंगामपूर्व द्राक्षांच्या मण्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचलेली पिके तर जवळपास नष्ट झाली असून, या पावसाचा दूरगामी परिणाम होऊन शेती उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिराने व धीम्या गतीने झाल्यामुळे जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्यापर्यंत खरिपाच्या जेमतेम पेरण्या होऊ शकल्या होत्या. त्यानंतर मात्र पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला. अशातच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहिले तर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या शेतकºयांनी पूर्ण केल्या, परंतु पावसाने त्यानंतर पाठ फिरविली. जमिनीच्या ओेलाव्यात पिकांनी चांगलाच तग धरून बºयापैकी पिके वाढलेली असताना पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली होती. अशातच भाद्रपदात उष्णतेचे प्रमाण वाढून कडक ऊन पडू लागले आहे. त्यामुळे जमिनीची आर्द्रता नष्ट होऊन पिके कोरडी पडू लागली असताना शेतकºयांनी कशीबशी पिके वाचविली आहेत. आता पिके काढणीला आलेली असताना बुधवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने जोरदार बरसून संपूर्ण जिल्ह्याला धुवून काढले आहे. अनेक गावांमध्ये शेतात गुडघ्याइतके पाणी साचले असून, काही ठिकाणी उभी बाजरी, मका, कांदा पावसाच्या तडाख्याने जमिनीवर झोपला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात या पिकांना धोका निर्माण झाला आहे. बाजरी जमिनीवर झोपली असून, कणसे भिजली आहेत. तर चाळीत साठवलेल्या कांद्यालाही या पावसाचा फटका बसणार आहे. आर्द्रता वाढल्याने चाळीतील कांदा ओला होऊन त्याच्या सडण्याची प्रक्रिया जोरदार होण्याची भीती कृषी खात्याने व्यक्त केली असून, लेट खरिपाच्या कांद्यासाठी लावलेली रोपेही पावसाच्या तडाख्याने उघड्यावर येऊन पडल्यामुळे संपूर्ण रोपे वाया जाण्याची शक्यता आहे. भाताला हलक्या पावसाची गरज असताना मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून जमिनीखाली असलेला भात बाहेर पडण्याची भीती आहे. विशेष करून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यात भात व नागली पिके या पावसामुळे अडचणीत सापडली असून, काढणीवर आलेले सोयाबीन, उडीद व मूगाच्या शेंगा फुटण्याची शक्यता आहे. या पावसाचा रब्बी पिकांना लाभ होणार असला तरी, असाच पाऊस सुरू राहिल्यास खरिपाची पिके नष्ट होण्याची धास्ती शेतकºयांना आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक