शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

परतीच्या पावसाने शेतकऱ्याचा केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:17 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतीतील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदे पाण्यात वाहून गेले, द्राक्ष पिकांवर डाऊनी, भुरीचा प्रादुर्भाव दिसून आला, मोठया प्रमाणावर गळ आणि कुज आली, सोयाबीनच्या दाण्यांना शेतातच मोड फुटले, मक्याच्या कणसाला अंकुर आले, टमाटे पिकाची वाताहत झाली, पालेभाज्या शेतातच सडून गेल्या, कोबी, फ्लॉवर खराब झाली जवळपास नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके आणि नगदी पिके यांची पुरती वाट लागली, त्यामुळे भरदार हंगामात परतीच्या पावसाने केला घात अस म्हणण्याची वेळ आली आहे

ठळक मुद्देसायखेडा : सत्तेच्या खुर्चीत भरपाईची परीक्षा कायम

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतीतील सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदे पाण्यात वाहून गेले, द्राक्ष पिकांवर डाऊनी, भुरीचा प्रादुर्भाव दिसून आला, मोठया प्रमाणावर गळ आणि कुज आली, सोयाबीनच्या दाण्यांना शेतातच मोड फुटले, मक्याच्या कणसाला अंकुर आले, टमाटे पिकाची वाताहत झाली, पालेभाज्या शेतातच सडून गेल्या, कोबी, फ्लॉवर खराब झाली जवळपास नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके आणि नगदी पिके यांची पुरती वाट लागली, त्यामुळे भरदार हंगामात परतीच्या पावसाने केला घात अस म्हणण्याची वेळ आली आहेजून महिन्यापासून यंदा चांगल्या पावसाला सुरवात झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, भात, पालेभाज्या, कोबी,फ्लॉवर,टमाटे यासारखे पिकांची लागवड केली होती तीन महिने सलग चांगला पाऊस पडत राहिल्याने पिकांनी जोम धरला होता. अखेरच्या टप्प्यात पिके परीपक्वतेकडे झुकले असतांना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली पाऊस एक दोन दिवस येऊन उघडून गेला नाही, तर सलग चौदा दिवस काही भागात पंधरा दिवस ठाण मांडून राहिला, दिवसरात्र बेभान होऊन बरसणाºया पावसाने आठ दिवस सूर्य दर्शन झाले नाही की घरातून माणसांना बाहेर पडू दिले नाही.जिथे माणसे, जनावरे जेरीस आले होते. तिथे कोवळ्या पिकांची काय गत असणार, पिके इतक्या दिवस पाण्यात भिजत राहिल्याने खराब झाली तर काही पिके पावसात अनेक रोगांना बळी पडली, रिमझिम तर कधी मूसळधार पाऊस पडला त्यामुळे पिके वाया गेली.लाखो रु पये खर्च करून उभी केलेली पीक शेतकºयांच्या डोळ्यासमोर वाया जात असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले.द्राक्षासारखे नगदी पीक लाखो रु पये भांडवलाचे आहे. पीक बहरले आणि काही दिवसात डोळ्यासमोर खराब झाली त्यामुळे शेतकºयांचा टाहो सरकार दरबारी पोहचला मात्र सत्तेच्या सरीपाटात राज्यकर्ते बळीराज्याच्या व्यथा विसरले, शासन दरबारी आवाज पोहचल्या नंतर भेटीना वेग आला भेटी झाल्या, पंचनाम्यांचे आदेश दिले गेले सरकारी बाबूनी आपली सेवा चोख बजावत पंचनामे पूर्ण केले शासनाला अहवाल सादर झाला.राज्यात ९० लाख हेक्तर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र नुकसान भरपाई म्हणून किती रक्कम मिळणार किंवा कधी मिळणार हा चेंडू आत्ता राष्टÑपती राजवटीच्या अधिपत्यात येत आहे, त्यामुळे शेतकºयांया नजर राज्यपालानाच्या निर्णयाकडे लागून राहिली आहे.अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची वाट लागल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांनी नैराश्येतून अखेर बागांवर कुºहाड चालवली आहे. दहा वर्षे सांभाळलेल्या बागा ज्या हातांनी लावल्या, वाढवल्या मेहनतीच्या जोरावर आणि कर्जाच्या भांडवलावर डोलणाºया बागेवर स्वत:च्या हाताने कुºहाड चालवण्याची वेळ आली यापेक्षा मोठे दुर्दैव नसेल.(फोटो १६ सायखेडा पाऊस)अवकाळी पावसामुळे काढणी झालेले कांदे पाण्यावर तरंगले 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी