शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

परतीच्या पावसाचा द्राक्ष, टमाट्याला फटका ; सोयाबीन भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 6:47 PM

ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.  

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा खरीप पिकांना फटका सततच्या हवामान बदलाने शेतकरी हवालदिल

नाशिक :  जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरण आणि परतीच्या पावसाचा मारा यामुळे विपरीत परिणाम होत असून, गेल्या महिनाभरात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. तर टमाटा आणि सोयाबीनच्या मळ्यांवर करपा, शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शहर परिसरातील गंगापूर, दुगाव, मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगाव, पिंपळगाव खांब, फाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.   नाशिक परिसरात कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याचा धोका वाढला आहे. फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान होणार असल्याने द्राक्षबागायतदारांनी द्राक्षबागांची विशेष काळजी घेत डिपिंग करण्यास सुरुवात केली असून, खराब झालेला शेंडा तोडून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असताना त्यातून सावरलेला शेतकरी अचानक झालेल्या वातावरणामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. सध्या फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला असून, फुलोऱ्यांतील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा प्रारंभिक  अवस्थेतच जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्यामुळे नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आता फुलोऱ्यातील बागांवर शेतकºयांना डिपींगच्या साह्याने रोगप्रतिबंधक उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.