शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

दिंडोरी तालुक्यातील ४०० परप्रांतीयांचा परतीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:33 PM

दिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत.

ठळक मुद्दे२० बसेसद्वारे रेल्वेस्टेशनवर पोहचविले

लोकमत न्युज नेटवर्कदिंडोरी : कामधंद्यासाठी उत्तर प्रदेशातून तालुक्यात दाखल झालेले सुमारे ४०० कामगार आपल्या गावी सुखरूप परतले आहेत. दिंडोरी तालुका प्रशासनाने चोख नियोजन करून २० बसेसद्वारे त्यांना नाशिकरोड रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचविले. तेथून ते रेल्वेने आपल्या गावी गेले.दिंडोरी तालुका प्रशासनाने प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार कैलास पवार, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी नियोजन करत तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या स्थलांतरित कामगारांची नोंदणी केली होती.नायब तहसीलदार सूर्यवंशी, तलाठी रोहिणी अळकुटे, सागर बोरस्ते यांनी दिंडोरी येथे नियोजन करत विविध गावांत बसेस पाठविल्या. त्यानुसार गुरु वारी मध्य प्रदेशमधील सुमारे दीडशे कामगारांना रवाना करण्यात आले, तर शनिवारी दुपारी वीस बसेसमधून उत्तर प्रदेशमधील कामगारांना रवाना करण्यात आले. यावेळी कामगारांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधेबद्दल राज्य सरकारचे व अधिकाऱ्यांचे आभार मानत कोरोनाचे संकट दूर झाले की पुन्हा येणार असल्याचे सांगत निरोप घेतला.तालुक्यातील दाखल असलेल्या बिहार व पश्चिम बंगालमधील कामगारांना घरवापसीची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यांच्या राज्यात कधी गाडी जाणार, याबाबत सरकारी कार्यालयात त्यांच्याकडून वारंवार विचारणा होत आहे.अनेक कामगारांनी केला घरी जाण्याचा बेत रद्ददिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार परप्रांतीय कामगार आहेत. त्यात अनेकांनी गावोगाव तहसील कार्यालयात गावी जाण्यासाठी नोंदणी केली होती. मात्र रेल्वेने जाणारे त्यात अत्यंत कमी आहेत. काही कामगार खासगी वाहनाने गावी गेले आहेत, मात्र आता कंपन्या सुरू झाल्याने तसेच लॉकडाउन शिथिल होत विविध कामे सुरू होण्याच्या अंदाज पाहता बहुतांशी कामगारांनी गावी परतण्याचा निर्णय रद्द केला आहे. नियमित रेल्वेसेवा सुरू होईल तेव्हाच परत जाण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सST Strikeएसटी संप