शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘ओखी’ वादळाचा परिणाम; शहरावर दाटले ढगकिमान तपमानात वाढ :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:45 AM

शहरातील थंडी अचानक झाली गायब; १६.१ अंश तपमानाची नोंदनाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानक वेगाने वाढू लागल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा दोन दिवसांत थेट १६.१ अंशावर पोहोचला. दक्षिण ...

ठळक मुद्दे‘ओखी’ वादळाचा परिणाम; शहरावर दाटले ढगकिमान तपमानात वाढ :

शहरातील थंडी अचानक झाली गायब; १६.१ अंश तपमानाची नोंद

नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानक वेगाने वाढू लागल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा दोन दिवसांत थेट १६.१ अंशावर पोहोचला. दक्षिण भारतातून गोवामार्गे गुजरातकडे सरकणाºया ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्टÑात पावसाची तर उत्तर महाराष्टÑात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.सोमवारी (दि.४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर होते. वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे उत्तर महाराष्टÑात काही दिवस ढगाळ हवामान राहणार असून, थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो. ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून, दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ओखी वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरीक्षण केंद्राने वर्तविली आहे. कारण दोन दिवसांपूर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सूर्यप्रकाशही होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले. गेल्या वर्षी मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती. काही दिवसांपूर्वी सातत्याने घसरत असलेला किमान तपमानाचा पारा लक्षात घेता डिसेंबरचा पहिला आठवडा हा क डाक्याच्या थंडीचा असू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता; मात्र अचाकपणे लहरी निसर्गानेरूप बदलले असून, आज जोरदार पावसाची शक्यतानाशिक : ‘ओखी’मुळे शहरावर ढग दाटले असून, हवामान खात्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त माहितीनुसार गुजरात-सौराष्टÑासह मुंबई आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, सौराष्टÑासह मुंबईमध्ये सोमवारी जोरदार पाऊस झाला. पावसासोबत वादळी वाराही जोरात होता. संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनससह गेटवे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट या भागाला दीड तास पावसाने जोरदार झोडपले. मंगळवारी (दि.५) नाशिकसह पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्टÑात वाºयाचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे. वाºयाचा वेग वाढून ७० कि.मी. प्रती तासही होऊ शकतो. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.