शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची जबाबदारी कृषी खात्यावर!

By sandeep.bhalerao | Updated: June 19, 2023 15:20 IST

अपात्र लाभार्थ्यांकडील वसुलीचे काम मात्र महसूल यंत्रणेकडे 

संदीप भालेराव, नाशिक : केंद्राच्यावतीने राबविण्यात येणारी पी.एम. किसान योजना कोणी राबवावी याबाबत कृषी आणि महसूल विभाग नेहमीच आमने सामने आलेले आहेत. अशातच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही योजना पूर्णपणे कृषी विभागानेच राबवावी असे स्पष्ट आदेशच देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या दोन योजना दोन स्वतंत्र यंत्रणांमार्फत राबविल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित असे उत्पन्न मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू करण्यात आलेली आहे. केंद्राच्यावतीने राज्यात राबविण्यात येत असलेली ही योजना महसूल यंत्रणेच्या माध्यमातून राबविली जात आहे. वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात देणारी ही योजना महसूल विभागाकडून राबविली जाते. मात्र शेतकऱ्यांसाठी असलेली ही योजना कृषी विभागाने राबविली पाहिजे असे महसूल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तर आर्थिक मदतीशी निगडित बाब असल्याने आणि महसूल विभागाकडेच जमिनीचे रेकॉर्ड असल्याने महसूल विभागाने योजना राबवावी असा अंतर्गत वाद आहे. महसूल आणि कृषी मंत्र्यांपर्यंत दोन्ही विभागाने आपापले म्हणणे मांडले आहे.

मात्र अजूनही पीएम किसान योजना महसूल विभागाकडूनच राबविली जात आहे. आता नमो शेतकरी योजना कृषी विभागाकडून राबविली जाणार असून या विभागाकडे सदर योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांची राहाणार आहे. कृषी विभागाने याबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’अंमलजबावणी

पहिला हप्ता एप्रिल ते जुलै २०००दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर २०००

तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च २००० 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकAgriculture Sectorशेती क्षेत्र