शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची जबाबदारी कृषी खात्यावर!

By sandeep.bhalerao | Updated: June 19, 2023 15:20 IST

अपात्र लाभार्थ्यांकडील वसुलीचे काम मात्र महसूल यंत्रणेकडे 

संदीप भालेराव, नाशिक : केंद्राच्यावतीने राबविण्यात येणारी पी.एम. किसान योजना कोणी राबवावी याबाबत कृषी आणि महसूल विभाग नेहमीच आमने सामने आलेले आहेत. अशातच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही योजना पूर्णपणे कृषी विभागानेच राबवावी असे स्पष्ट आदेशच देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या दोन योजना दोन स्वतंत्र यंत्रणांमार्फत राबविल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित असे उत्पन्न मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू करण्यात आलेली आहे. केंद्राच्यावतीने राज्यात राबविण्यात येत असलेली ही योजना महसूल यंत्रणेच्या माध्यमातून राबविली जात आहे. वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात देणारी ही योजना महसूल विभागाकडून राबविली जाते. मात्र शेतकऱ्यांसाठी असलेली ही योजना कृषी विभागाने राबविली पाहिजे असे महसूल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तर आर्थिक मदतीशी निगडित बाब असल्याने आणि महसूल विभागाकडेच जमिनीचे रेकॉर्ड असल्याने महसूल विभागाने योजना राबवावी असा अंतर्गत वाद आहे. महसूल आणि कृषी मंत्र्यांपर्यंत दोन्ही विभागाने आपापले म्हणणे मांडले आहे.

मात्र अजूनही पीएम किसान योजना महसूल विभागाकडूनच राबविली जात आहे. आता नमो शेतकरी योजना कृषी विभागाकडून राबविली जाणार असून या विभागाकडे सदर योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांची राहाणार आहे. कृषी विभागाने याबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’अंमलजबावणी

पहिला हप्ता एप्रिल ते जुलै २०००दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर २०००

तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च २००० 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिकAgriculture Sectorशेती क्षेत्र