शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रहिवास क्षेत्रात दुपटीने वाढ

By admin | Updated: January 11, 2017 00:17 IST

विकास आराखडा : पायाभूत सुविधा पुरवताना मनपावर पडणार ताण

नाशिक : राज्य शासनाने मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यात ७७ आरक्षणांमध्ये सुधारणा करतानाच रहिवास क्षेत्रात दुपटीने वाढ केली आहे. यापूर्वीच्या विकास आराखड्यात एकूण क्षेत्रफळाच्या २१ टक्के रहिवास क्षेत्र दर्शविण्यात आले होते, तर ४८ टक्के क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. सुधारित आराखड्यात काही आरक्षणांमध्ये बदल करत ते रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्याने भविष्यात विस्तारणाऱ्या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविताना महापालिकेवर प्रचंड आर्थिक ताण पडणार आहे. राज्य शासनाने सोमवारी भागश: शहर विकास आराखडा मंजूर करताना ७७ आरक्षणांमध्ये सुधारणा कायम केल्या आहेत, तर ७९ आरक्षणांसंबंधी दुरुस्त्या सुचवत त्यासाठी सूचना व हरकती मागविल्या आहेत. आराखड्यात काही आरक्षणांमध्ये सुधारणा करताना शासनाने रहिवास क्षेत्रात वाढ करत शहराच्या वाढत्या विस्तारीकरणाला एकप्रकारे प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात शहरात नवीन वसाहतींच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रालाही चांगल्या प्रकारे बूस्ट मिळणार आहे. नाशिक शहराचे एकूण क्षेत्रफळ २६७.४८ चौ.कि.मी. असून, सन २०१६ ची अंदाजित लोकसंख्या २४ लाख ५० हजार गृहीत धरूनच आराखडा तयार करण्यात आला आहे, तर सन २०३६ ची अंदाजित लोकसंख्या ३४ लाख गृहीत धरण्यात आली आहे. शहराचा भविष्यात होणारा विस्तार व वाढती लोकसंख्या गृहीत धरून रहिवास क्षेत्रात वाढ करण्याचा आणि त्यासाठी स्वतंत्र टाऊनशिप साकारण्याबाबतचा प्रस्ताव आराखडाकार नगररचनाचे सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांनी दिला होता. त्यानुसार, त्याचे बरेचसे प्रतिबिंब नवीन विकास आराखड्यात पडल्याचे दिसून येत आहे. सन १९९६ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात २१ टक्के रहिवास क्षेत्र होते तर भुक्ते यांनी ते ४८ टक्के इतके प्रस्तावित केले आहे. त्यामुळे रहिवास क्षेत्रात वाढ होणार असल्याने भविष्यात सोयी-सुविधा पुरविताना महापालिकेवर प्रचंड ताण पडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर रिंगरोड झाल्याने कनेक्टीव्हीटी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या बाहेरील हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकासाला वाव आहे. त्यातून आराखड्यात रहिवास क्षेत्रात वाढ केल्याने महापालिकेला नागरी सुविधा पुरवाव्या लागतील.