शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

रहिवास क्षेत्रात दुपटीने वाढ

By admin | Updated: January 11, 2017 00:17 IST

विकास आराखडा : पायाभूत सुविधा पुरवताना मनपावर पडणार ताण

नाशिक : राज्य शासनाने मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यात ७७ आरक्षणांमध्ये सुधारणा करतानाच रहिवास क्षेत्रात दुपटीने वाढ केली आहे. यापूर्वीच्या विकास आराखड्यात एकूण क्षेत्रफळाच्या २१ टक्के रहिवास क्षेत्र दर्शविण्यात आले होते, तर ४८ टक्के क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. सुधारित आराखड्यात काही आरक्षणांमध्ये बदल करत ते रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्याने भविष्यात विस्तारणाऱ्या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविताना महापालिकेवर प्रचंड आर्थिक ताण पडणार आहे. राज्य शासनाने सोमवारी भागश: शहर विकास आराखडा मंजूर करताना ७७ आरक्षणांमध्ये सुधारणा कायम केल्या आहेत, तर ७९ आरक्षणांसंबंधी दुरुस्त्या सुचवत त्यासाठी सूचना व हरकती मागविल्या आहेत. आराखड्यात काही आरक्षणांमध्ये सुधारणा करताना शासनाने रहिवास क्षेत्रात वाढ करत शहराच्या वाढत्या विस्तारीकरणाला एकप्रकारे प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात शहरात नवीन वसाहतींच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रालाही चांगल्या प्रकारे बूस्ट मिळणार आहे. नाशिक शहराचे एकूण क्षेत्रफळ २६७.४८ चौ.कि.मी. असून, सन २०१६ ची अंदाजित लोकसंख्या २४ लाख ५० हजार गृहीत धरूनच आराखडा तयार करण्यात आला आहे, तर सन २०३६ ची अंदाजित लोकसंख्या ३४ लाख गृहीत धरण्यात आली आहे. शहराचा भविष्यात होणारा विस्तार व वाढती लोकसंख्या गृहीत धरून रहिवास क्षेत्रात वाढ करण्याचा आणि त्यासाठी स्वतंत्र टाऊनशिप साकारण्याबाबतचा प्रस्ताव आराखडाकार नगररचनाचे सहायक संचालक प्रकाश भुक्ते यांनी दिला होता. त्यानुसार, त्याचे बरेचसे प्रतिबिंब नवीन विकास आराखड्यात पडल्याचे दिसून येत आहे. सन १९९६ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात २१ टक्के रहिवास क्षेत्र होते तर भुक्ते यांनी ते ४८ टक्के इतके प्रस्तावित केले आहे. त्यामुळे रहिवास क्षेत्रात वाढ होणार असल्याने भविष्यात सोयी-सुविधा पुरविताना महापालिकेवर प्रचंड ताण पडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर रिंगरोड झाल्याने कनेक्टीव्हीटी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या बाहेरील हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकासाला वाव आहे. त्यातून आराखड्यात रहिवास क्षेत्रात वाढ केल्याने महापालिकेला नागरी सुविधा पुरवाव्या लागतील.