ग्रामसेवकांचे तहसीलदारांना निवेदन
By Admin | Updated: December 1, 2015 23:33 IST2015-12-01T23:29:32+5:302015-12-01T23:33:46+5:30
ग्रामसेवकांचे तहसीलदारांना निवेदन

ग्रामसेवकांचे तहसीलदारांना निवेदन
नांदगाव : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासोबतच सर्वेक्षण करण्याची सक्ती करू नये, असे निवेदन देणाऱ्या ग्रामसेवकावरच पोलीस कारवाई करणाऱ्या खेड जिल्हा रत्नागिरी येथील तहसीलदार कदम यांच्यावर निलंबन करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत तालुक्यातील ग्रामसेवकांच्या संघटनेने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलने केले.
ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायतीची कामे त्यासोबतच विविध योजनांची अंमलबजावणी व राज्यातील दुष्काळ निवारण उपाययोजन, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, मजुरांना रोजगार आदि स्वरूपाचा प्रचंड व्याप असताना ग्रामसेवकावर लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याची अतिरिक्त जबाबदारी टाकू नये, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे; मात्र संघटनेने त्यास विरोध करीत त्याबाबतचे निवेदन खेड येथील तहसीलदारांना देण्याचा प्रयत्न केला असता, जाणीवपूवक ग्रामसेवकावर पोलिसातर्फेखोटे गुन्हे नोंदवित ग्रामसेवकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप निकम, बाळासाहेब सरोदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन दिले. यावेळी एच. पी.दराडे, जे.के. वाघ, एस.जे. बोरसे, बी.व्ही. जाधव, एस.बी. मोहिते, बी.एस. गेंद, ए. बी. सोनवणे, पी. के. थोरात, सी.पी. जगताप, एन. के. अमृतकर, ए.जे. गांगुर्डे, जी. टी. खैरनार आदि उपस्थित होते.
पेठ : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन पेठ शाखेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करून तहसीलदार कैलास कडलग यांना निवेदन दिले.
राज्यभर ग्रामसेवकांकडे विविध अभियाने, योजना, दुष्काळ निवारण, पाणीटंचाई, मजुरांना रोजगार यासारखी इतर अनेक कामे असतात. त्यांच्याकडे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी सर्वेक्षण व अद्ययावतीकरणाचे निवेदन देण्यात आले; मात्र दि. २१/१०/२०१५ रोजी राज्य संघटनेने निवेदन मंत्रिमहोदय व प्रधान सचिवांना मुंबई येथे देऊन आदरपूर्वक हे काम नाकारले. खेड, जि. रत्नागिरी येथील तहसीलदार अमोल किसन कदम यांनी विनाचौकशी आकस बुद्धीने ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या या बेकायदेशीर कृत्याबद्दल पेठ तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार कैलास कडलग यांना निवेदन दिले.