प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:24+5:302021-02-05T05:43:24+5:30
नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंचच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी ‘प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था’ ...

प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था
नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंचच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी ‘प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था’ या उपक्रमांतर्गत वालदेवी नदीकिनारी दशक्रिया घाट, महादेव मंदिर येथे दीपोत्सव व वालदेवी नदीची आरती करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भारतमाता प्रतिमा पूजन व झेंडावंदन करून करण्यात आली. वालदेवी नदीकिनारी सायंकाळी वंदे मातरम् हे गीत बासरीच्या सुरामध्ये बासरी वादक बिवलकर यांनी सादर केले. दीपोत्सवाची सुरुवात आमदार सरोज अहिरे, मनपा अधिकारी डॉ. कल्पना कुटे, मंचाचे अध्यक्ष उदय थोरात, निशिकांत पगारे यांनी दीपमाळ प्रज्वलित करून केली. कार्यक्रमात जनजागृती हेतू जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नदीचे गटारीकरण बंद करा, नदीत सुका कचरा व इतर साहित्य टाकू नका, नदी परिसर स्वच्छ ठेवा. मलजलमिश्रित पाण्यामुळे होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाला व नागरिकांना यानिमित्ताने करण्यात आले.
गंगा, गोदावरी व वालदेवी नदीची आरती उदय गोसावी महाराज व समूह यांनी म्हटली. पर्यावरणविषयी काम करणाऱ्या व स्वतःचा ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र सरकारला सादर करणाऱ्या मातोश्री पॉलिटेक्निकचे विद्यार्थी संदीप गुप्ता, जितेंद्र शेवाळे, प्रणव केदार, चेतन ठाकरे, संकेत सोमवंशी, संतोष जगताप यांचा स्मृतिचिन्ह व प्रमापत्र देऊन गौरव करण्यात आला. नाशिक शहर व पर्यटन ठिकाणी कचरा गोळा करून स्वछता करण्यासाठी नाशिक प्लॉग्गेर्स ग्रुपचे तेजस तलवार व इतरांचा स्मृतिचिन्ह व प्रमापत्र देऊन गौरव करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांंनी पर्यावरण या विषयावर काम करणाऱ्या संस्थांना स्वच्छ संरक्षण अभियानामध्ये समाविष्ट करून त्यांच्यासोबत काम करण्यात येईल, असे स्पष्ट केले. कार्यक्रमास गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे निशिकांत पगारे, योगेश बर्वे, नंदिनी संवर्धन समितीच्या वैशाली चव्हाण, सोमनाथ मुठाळ, सुनीलसिंग परदेशी, रोहित कानडे, नमामि गोदाचे शिरीष दंदणे, नंदकिशोर गायकवाड, विजय देशमुख, संदीप नागरे, अर्जुन टिळे, तेजस पाठक, संजय कोल्हे आदींसह पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. स्वागत मंचाचे संथापक अध्यक्ष उदय थोरात यांनी केले. सूत्रसंचालन सुनील मेंढेकर यांनी केले. वालदेवी नदी घाट स्वच्छतेसाठी मनपाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, निरीक्षक राजू निर्भवणे, विजय जाधव, बाळू जाधव यांनी परिश्रम घेतले. (फोटो:आर:एनकेआरडी)