धनगर समाज कृ ती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन
By Admin | Updated: July 30, 2014 00:18 IST2014-07-29T22:48:22+5:302014-07-30T00:18:25+5:30
धनगर समाज कृ ती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

धनगर समाज कृ ती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन
सटाणा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणामध्ये राज्य शासनाने समावेश करावा या मागणीसाठी बागलाण तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात धनगर समाज पूर्णपणे मागासलेला असून, शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या पूर्णपणे मागासलेला असून, गेल्या ६५ वर्षांपासून राज्य घटनेच्या तरतुदीनुसार केवळ धनगर आणि धनगड या र व ड या भाषिक
फरकामुळे समाजाला सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. धनगर व धनगड ही एकच जमात असून, केवळ राजकीय सुडापोटी या समाजाला सवलतीपासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात येत आहे. शासनाने ३१ जुलैअखेर योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊलाला तांबडे, मजूर संघाचे अध्यक्ष राजाभाऊ खेमणार, खंडेराव पाटील, धनंजय बुडडे, अनिल जाधव, नगरसेवक भारत काटके, शंकर कांदळकर, सी. पी. पाकळे, मुन्ना धाबळे, अनिल पाकळे, प्रभाकर वानले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)