कळवणला मराठा समाजात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:15 IST2021-05-06T04:15:03+5:302021-05-06T04:15:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला असून ...

कळवणला मराठा समाजात नाराजी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. मराठा समाजाला यामुळे प्रचंड मोठा धक्का बसला असून संपूर्ण मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण झाल्याची प्रतिक्रिया छावाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रमोद रौंदळ यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात आले आहे मग महाराष्ट्रासाठी कायदे वेगळे आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. इतर समाजातील लोक मागास असू शकतात, तर मराठा समाज मागास असू शकत नाही का , असा प्रश्न शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, मनसेचे माजी शहरप्रमुख नितीन पगार यांनी उपस्थित केला आहे.
ज्या महाराष्ट्राचे मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी नेतृत्व केले अशा समाजाला आरक्षण मिळू नये यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कुठलीही नाही असे मत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पगार, टिनू पगार यांनी व्यक्त केले.
या निर्णयाचा फेरविचार व्हावा, सरकारने यातून सकारात्मक मार्ग काढावा, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी मनोज देवरे, मोती पगार, नितीन पगार, रवींद्र पगार, राकेश हिरे, ललित आहेर, भास्कर चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो - ०५ कळवण मराठा
सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देतांना प्रदीप पगार, प्रमोद रौदल, टिनू पगार,मोती पगार, नितीन पगार आदी.
===Photopath===
050521\05nsk_17_05052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ कळवण मराठा