साठ्यावरील मर्यादा हटविल्याने किराणा बाजारातील मरगळ दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:32+5:302021-07-26T04:13:32+5:30

चौकट- काकडी २७ रु. किलो मागील काही दिवसांत काकडीचे दर खूपच खाली आले होते. मात्र, पावसामुळे आवक कमी झाल्याने ...

Removing stock limits removes groceries | साठ्यावरील मर्यादा हटविल्याने किराणा बाजारातील मरगळ दूर

साठ्यावरील मर्यादा हटविल्याने किराणा बाजारातील मरगळ दूर

चौकट-

काकडी २७ रु. किलो

मागील काही दिवसांत काकडीचे दर खूपच खाली आले होते. मात्र, पावसामुळे आवक कमी झाल्याने गेल्या दोन दिवसांत काकडीच्या दरात वाढ झाली असून, घाऊक बाजारात काकडी दहा ते २७.५० रुपये किलो या दराने विकली जात आहे.

चौकट-

तूर डाळ स्थिर

किराणा बाजारात मसूर, हरभरा, मूग या डाळींच्या दरामध्ये दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. तूर डाळीचे दर मात्र स्थिर असल्याचे दिसून आले. इतर किराणा मालाच्या दरामध्ये फारसा फरक झालेला नाही.

चौकट-

सफरचंद २२० रु. किलो

बहुतेक फळांचा हंगाम संपत आल्याने त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. त्यातुलनेत मागणी कायम असल्यामुळे फळांच्या दरामध्ये तेजी कायम आहे. सफरचंद १३० ते २२० रुपये किलो, तर मोसंबी २० ते ४० रुपये किलोपर्यंत आहे.

कोट-

केंद्र शासनाने साठ्यावरील मर्यादा उठविल्यामुळे किराणा बाजारात काहीसे तेजीचे वातावरण असून, या सप्ताहात ग्राहकी चांगली राहिली आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून बाजारात अगदीच मंदीचे सावट होते, त्यात थोडीफार सुधारणा झाली आहे.

- अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

पाऊस सुरू झाल्याने शेतातून भाज्या काढणे शक्य होत नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे भाजीपाला विकून शेतकऱ्यांच्या हाती फार काही राहते असे नाही, तर केवळ खर्चाची तोंडमिळवणी होते.

- पांडुरंग कासार, शेतकरी

कोट-

वांगी, गवार, दोडका आदी भाज्यांसाठी किमान ५०, ६० रुपये मोजावे लागतात. त्यात आता पुन्हा तेल वाढले आहे. नेहमीच होणाऱ्या भाववाढीमुळे महिन्याला दिल्या जाणाऱ्या घरखर्चाच्या पैशांमध्ये भागवायचे कसे, असा प्रश्न निर्माण होतो.

- पल्लवी जाधव, गृहिणी

Web Title: Removing stock limits removes groceries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.