शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

१७०० हेक्टरवरील पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:22 IST

सायखेडा : दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात घेता निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील काही गावे आणि सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त गावांना वरदान ठरलेल्या कडवा कालव्याला १ डिसेंबरपासून २६ ते २७ दिवसांचे आवर्तन सोडण्यात आल्याने १७०० हेक्टरवरील रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे कडवा कालव्याला आवर्तन सुटले : ८५० दशलक्ष घनफूट पाणी सोडणार

सायखेडा : दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात घेता निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील काही गावे आणि सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त गावांना वरदान ठरलेल्या कडवा कालव्याला १ डिसेंबरपासून २६ ते २७ दिवसांचे आवर्तन सोडण्यात आल्याने १७०० हेक्टरवरील रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे.१६८० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या कडवा धरणात सध्या १३५० दशलक्ष घनफूट जलसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ८५० दशलक्ष घनफूट पाणी सिंचन आणि बिगरसिंचनासाठी वापरण्यात येणार आहे, तर उर्वरित जलसाठा दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. कालव्याला आज प्रारंभी २७५ क्यूसेकने विसर्ग सुरू असून, अखेरपर्यंत ३५० क्युसेसपर्यंत सोडण्यात येणार आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या कडवा कालवा क्षेत्रातील २६ गावांना याचा फायदा होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शरद गायधनी यांनी दिली आहे.यंदा पावसाचे प्रमाण अल्प असल्याने कडवा कालवा परिक्षेत्रातील विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठला आहे. पाण्यामुळे खरीप हंगामातील पिकेदेखील करपून गेली होती. सोयाबीन, मका, ऊस, कांदे या नगदी पिकांना पाणी नसल्याने भांडवली खर्चसुद्धा पाण्यात गेला. थोड्याफार प्रमाणात असलेल्या फळबागा वाचविण्यासाठी आणि रब्बी हंगामातील हरभरा, गहू, उन्हाळी कांदा यासाठी कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे अनेक दिवसांपासून केली होती. मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत कडवा कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी आमदार अनिल कदम यांनी सातत्याने लावून धरली होती. दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी पाणी आरक्षित असल्याने केवळ ८५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ डिसेंबरपासून आवर्तन सोडण्यात आले.दुष्काळाच्या झळा असल्या तरी कडवा कालव्याला आलेले पाणी शेतकºयांना दिलासा देणार आहे. पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाºयाचा प्रश्न सध्यातरी सुटला आहे. त्यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे--------------------------कडवा धरणातून सिंचन आणि बिगरसिंचनासाठी ८५० दशलक्ष घनफूट पाणी कडवा कालव्याला सोडण्यात आले असून, हे आवर्तन साधारणत: २६ ते २७ दिवस सुरू राहणार आहे. उर्वरित जलसाठा आरक्षित असल्याने सोडण्यात येणार आहे. आज ७५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. क्षमता लक्षात घेता अखेरपर्यंत ३५० क्युसेसपर्यंत विसर्ग होऊ शकतो.- शरद गायधनी, मुख्य कार्यकारी अभियंता---------------------------दुष्काळी स्थितीमुळे विहिरींनी तळ गाठला होता. खरीप हंगामातील पिके तर वाया गेलीच, रब्बी हंगामातील पिकेही पाण्याअभावी करपून चालली होती. फळबागा वाचवणे जिकिरीचे होऊन बसले होते. अशा परिस्थितीत कडवा कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी आमदार अनिल कदम यांच्याकडे वारंवार केली होती. कालव्याला पाणी आल्याने मोठा आधार आला आहे.-भाऊसाहेब कमानकर, शेतकरी------------------------पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. कडवा लाभक्षेत्रातील शेतकºयांनी हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येऊन पाणीवापर संस्था स्थापन केली पाहिजे. म्हणजे भविष्यात मागणी वाढेल आणि पाणी आरक्षित होईल. यासाठी परिसरातील शेतकºयांनी पुढाकार घेतला आहे. लाभधारक क्षेत्रातील शेतकºयांनी भेंडाळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा.- गोरख खालकर, भेंडाळी