शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

धार्मिक धु्रवीकरणातून समाजात तेढ : सुषमा अंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:23 IST

राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.

सातपूर : राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.  अशोकनगर येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने व बीएमए ग्रुपच्या सहकार्याने आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमप्रसंगी आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मोहन अढांगळे होते. यावेळी प्रा. अंधारे म्हणाल्या की, केंद्र सरकार मूळ विषयापासून दूर गेले असून, जनतेची दिशाभूल करण्यासाठी मंदिराचा मुद्दा पुढे करीत आहे. मुळात जनतेला मंदिर, मशीद किंवा विहार नको आहे तर विकासाची अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी अगोदर संविधानाची अंमलबजावणी करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. देशातील जनतेने वारंवार ईव्हीएम मशीनविषयी शंका उपस्थित करूनही केंद्र सरकार मात्र ईव्हीएम बदलण्यास तयार नसून यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा आरोपही त्यांनी केला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते शिलरत्न, भन्ते धम्मरत्न, राहुल बच्छाव, कविता कर्डक, वाय. डी. लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज पगारे यांनी केले. सूत्रसंचालन जगन्नाथ भरीत यांनी केले. यशवंत तेलोरे यांनी आभार मानले. यावेळी संजय भरीत, यशवंत भवरे, भगवान भालेराव, सुभाष पोटभरे, रुपराव तायडे, मधुकर खंडवी आदी उपस्थित होते. व्याख्यानानंतर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्र म घेण्यात आला.बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेलघटनेनुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. बहुजनांची मुले जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने या सर्व शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे तसेच खासगी शाळांचे शुल्क माफ केले पाहिजे तरच बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असा आशावाद सुषमा अंधारे यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :NashikनाशिकConstitution Dayसंविधान दिन