शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

धार्मिक धु्रवीकरणातून समाजात तेढ : सुषमा अंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:23 IST

राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.

सातपूर : राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.  अशोकनगर येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने व बीएमए ग्रुपच्या सहकार्याने आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमप्रसंगी आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मोहन अढांगळे होते. यावेळी प्रा. अंधारे म्हणाल्या की, केंद्र सरकार मूळ विषयापासून दूर गेले असून, जनतेची दिशाभूल करण्यासाठी मंदिराचा मुद्दा पुढे करीत आहे. मुळात जनतेला मंदिर, मशीद किंवा विहार नको आहे तर विकासाची अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी अगोदर संविधानाची अंमलबजावणी करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. देशातील जनतेने वारंवार ईव्हीएम मशीनविषयी शंका उपस्थित करूनही केंद्र सरकार मात्र ईव्हीएम बदलण्यास तयार नसून यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा आरोपही त्यांनी केला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते शिलरत्न, भन्ते धम्मरत्न, राहुल बच्छाव, कविता कर्डक, वाय. डी. लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज पगारे यांनी केले. सूत्रसंचालन जगन्नाथ भरीत यांनी केले. यशवंत तेलोरे यांनी आभार मानले. यावेळी संजय भरीत, यशवंत भवरे, भगवान भालेराव, सुभाष पोटभरे, रुपराव तायडे, मधुकर खंडवी आदी उपस्थित होते. व्याख्यानानंतर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्र म घेण्यात आला.बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेलघटनेनुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. बहुजनांची मुले जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने या सर्व शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे तसेच खासगी शाळांचे शुल्क माफ केले पाहिजे तरच बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असा आशावाद सुषमा अंधारे यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :NashikनाशिकConstitution Dayसंविधान दिन