शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धार्मिक धु्रवीकरणातून समाजात तेढ : सुषमा अंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:23 IST

राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.

सातपूर : राज्य सरकार नागरिकांच्या नागरी मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप विचारवंत प्रा. सुषमा अंधारे यांनी केला.  अशोकनगर येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने व बीएमए ग्रुपच्या सहकार्याने आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमप्रसंगी आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मोहन अढांगळे होते. यावेळी प्रा. अंधारे म्हणाल्या की, केंद्र सरकार मूळ विषयापासून दूर गेले असून, जनतेची दिशाभूल करण्यासाठी मंदिराचा मुद्दा पुढे करीत आहे. मुळात जनतेला मंदिर, मशीद किंवा विहार नको आहे तर विकासाची अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनी अगोदर संविधानाची अंमलबजावणी करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. देशातील जनतेने वारंवार ईव्हीएम मशीनविषयी शंका उपस्थित करूनही केंद्र सरकार मात्र ईव्हीएम बदलण्यास तयार नसून यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा आरोपही त्यांनी केला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते शिलरत्न, भन्ते धम्मरत्न, राहुल बच्छाव, कविता कर्डक, वाय. डी. लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज पगारे यांनी केले. सूत्रसंचालन जगन्नाथ भरीत यांनी केले. यशवंत तेलोरे यांनी आभार मानले. यावेळी संजय भरीत, यशवंत भवरे, भगवान भालेराव, सुभाष पोटभरे, रुपराव तायडे, मधुकर खंडवी आदी उपस्थित होते. व्याख्यानानंतर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्र म घेण्यात आला.बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेलघटनेनुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. बहुजनांची मुले जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने या सर्व शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे तसेच खासगी शाळांचे शुल्क माफ केले पाहिजे तरच बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असा आशावाद सुषमा अंधारे यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :NashikनाशिकConstitution Dayसंविधान दिन