शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

संततधारेमुळे शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:02 PM

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी दाखवली त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रु पाली, एक हजार आठ अश्या नामवंत भाताच्या वाणांच्या रोपांची पेरणी केली.

ठळक मुद्देइगतपुरी : पूर्व भागातील भात लागवडीला अखेर मुहूर्त

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी दाखवली त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रु पाली, एक हजार आठ अश्या नामवंत भाताच्या वाणांच्या रोपांची पेरणी केली.

            या सोबतच उडीद, सोयाबीन, भुईमुग, खुरासणी आदी पिकांसोबत शेतकºयांनी बागायती भाजीपाला पिकांची जोरात लागवड केली होती, परंतु जूनच्या सुरु वातीलाच वरूणराज्याने दमदार हजेरी लावल्यानंतर आजपर्यंत पाऊसच पडला नाही, या कारणास्तव तालुक्यातील शेतकरी राजा हवालदिल झाला. अनेक शेतकºयांची जून, जुलै, आॅगस्ट पर्यंत केवळ पावसाच्या पाण्यावाचून भाताची रोपे कडाक्याच्या उन्हामुळे पिवळी झाली व अनेकांच्या भाताच्या रोपांचे नुकसानही झाले, तसेच अनेक शेतकºयांनी शेतात पिकांसाठी भरमसाठ खर्च करूनही त्यांना केवळ पावसाच्या पाण्यावाचून आजपर्यंत भात लागवड करता आली नाही.

                      मात्र इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील भाताची लागवड अद्यापही झालेली नव्हती. शेतकºयाला तब्बल तीन महिने पावसाची प्रतीक्षा करावी लागली. टाकेद परिसरातील अनेक गांवातील शेतकरी, वारकºयांनी चक्क पाऊस पडावा म्हणून दिंडी काढून हरी नामाच्या जय घोष करीत टाकेद येथील सर्वतीर्थावर जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांना साकडे देखील घातले होते. अन दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली अन् भात लागवडीसाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. 

                               बुधवारी (दि.१२) मध्यरात्रीपासून टाकेद परिसरात बरसत राहिलेल्या मुसळधार पावसाने दमदार सुरु वात केल्याने इगतपुरी सह टाकेद परिसरातील नद्या, नाले, ओहळ वाहायला सुरु वात झाली आहे. या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी भाताच्या लागवडी वाचून बेरोजगार होऊन घरी बसून रोजगाराच्या शोधार्थ असलेला मजूर वर्ग आज पुन्हा शेतातील कामांत व्यस्त झाला आहे. जणू काही दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शेतकºयांनी व रोजंदारीने शेतात काम करणाºया मजूर वर्गाने मोकळा श्वास घेतला.

                          टाकेद परिसरात भाताची लागवड करण्यासाठी शेतकºयांची लगबग तर अनेक शेतकरी विहिरीच्या पाण्यावर लागवड केलेल्या भात शेतीला खतांचा मारा करतांना दिसत आहे.(फोटो १३ टाकेद,३ )टाकेद परिसरात भात लागवड करतांना मजुरांसमवेत शेतकरी.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी