नदीपात्रात रोजच पडतेय झोपड्यांची भर पालिकेचे दुर्लक्ष : केवळ नोटिसांपुरतेच उपचार

By Admin | Updated: May 25, 2014 00:14 IST2014-05-24T19:45:12+5:302014-05-25T00:14:38+5:30

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Regarding neglect of the hutments in the river bed regularly: only treatment for the treatment | नदीपात्रात रोजच पडतेय झोपड्यांची भर पालिकेचे दुर्लक्ष : केवळ नोटिसांपुरतेच उपचार

नदीपात्रात रोजच पडतेय झोपड्यांची भर पालिकेचे दुर्लक्ष : केवळ नोटिसांपुरतेच उपचार

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरीकरणामुळे रोजच शेकडो नागरिक रोजगाराच्या शोधासाठी नाशिकमध्ये येतात आणि याच शहरात वास्तव्यास राहतात. निवार्‍यासाठी असे नागरिक झोपडप˜्यांचा आधार घेतात. प्रामुख्याने नदीकाठीच अशाप्रकारे झोपड्या होतात आणि त्या वाढतात. शहरात अशा अनेक झोपडप˜्या असून, त्या हटवणे पालिकेला शक्य झालेले नाही. गोदाकाठी मल्हारखाण झोपडप˜ी अशीच वसली गेली आणि आता अधिकृतही झाली आहे. परंतु तेथेही झोपड्या वाढत चालल्या आहेत. नासर्डी नदीलगत तर अशा मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. सातपूर येथील महादेववाडी, कांबळेवाडी या झोपडप˜्या अशाच प्रकारे वसल्या असून, त्या आयटीआय पूल आणि त्यापलीकडेदेखील वाढल्या आहेत. मुंबई नाका आणि त्यानंतर आता शिवाजीवाडी अशाच प्रकारे वाढत आहे. एरव्ही ही नदी बारमाही नसल्याने अडचण उद्भवत नाही. परंतु पावसाळ्यात पुराच्या पाण्याने घरे आणि झोपड्या वाहून जाण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अनेकदा जीवित हानी होते. तरीही झोपडप˜्या बांधायचे थांबत नाही. त्यामुळे केवळ 
अतिक्रमणे रोखणार कोण?
महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग स्वतंत्र आहे. परंतु या विभागामार्फत अशा प्रकारे अतिक्रमण होऊच नये, यासाठी कोणतेही परिश्रम घेतले जात नाही. परिणामी हा प्रश्नही सुटत नाही.
 
घरकुल योजनेचा पर्यायही दूरच
नदीपात्रातील धोकादायक झोपडप˜ीवासीयांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरे देण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते. परंतु अनेक नागरिकांकडे पुरावा नाही आणि समजा घरे दिलीच तरी पुन्हा याच ठिकाणी झोपडप˜्या वाढणार नाहीत, याची शाश्वती नाही.

Web Title: Regarding neglect of the hutments in the river bed regularly: only treatment for the treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.