शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

सोमवारपासून रेल्वे देणार तिकीटाचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:04 IST

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात

ठळक मुद्देआरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणारविशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या भारतीय रेल्वेने येत्या एक जूनपासून देशात दोनशे श्रमिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेवून त्यासाठी आगावू तिकीट बुकींग सुरू केले असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, त्यातही फक्त परप्रांतिय प्रवाशीच प्रवास करू शकतील. या निमित्ताने रेल्वे आपल्या प्रवाशी वाहतुकीला प्रारंभ करीत असून, त्याच बरोबर दोन महिन्यांपुर्वी तिकीट आरक्षित केलेल्या परंतु रेल्वे रद्द झाल्याने प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे सोमवारपासून परत करण्यासही सुरूवात होत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात आरक्षण तिकिटाची रक्कम जमा केली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आरक्षण केंद्राच्या खिडकी वरून प्रत्यक्ष आरक्षण तिकीट घेतले होते, त्या प्रवाशांना येत्या सोमवार (दि. २५)पासून आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड देण्यात येणार आहे. मात्र रिफंड घेण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन रिफंड घेण्यास यावे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकिटाचा कालावधी हा ३० दिवसासाठी आहे. संबंधित रेल्वेचे आरक्षण तिकीट हे वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्या प्रवाशाला रेल्वेमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रवाशाने रेल्वे सुरू होण्यापूर्वीच आपले वेटिंग लिस्टमध्ये असलेले आरक्षण रद्द करून रिफंड घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करण्यास गेल्यावर त्यांना रिफंड मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशाचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्याने सुद्धा गाडी सुरू होण्यापूर्वीच आपले आरक्षण तिकीट रद्द करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

सोमवारपासून रेल्वे देणार तिकीटाचा परतावालोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या भारतीय रेल्वेने येत्या एक जूनपासून देशात दोनशे श्रमिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेवून त्यासाठी आगावू तिकीट बुकींग सुरू केले असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, त्यातही फक्त परप्रांतिय प्रवाशीच प्रवास करू शकतील. या निमित्ताने रेल्वे आपल्या प्रवाशी वाहतुकीला प्रारंभ करीत असून, त्याच बरोबर दोन महिन्यांपुर्वी तिकीट आरक्षित केलेल्या परंतु रेल्वे रद्द झाल्याने प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे सोमवारपासून परत करण्यासही सुरूवात होत आहे.कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात आरक्षण तिकिटाची रक्कम जमा केली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आरक्षण केंद्राच्या खिडकी वरून प्रत्यक्ष आरक्षण तिकीट घेतले होते, त्या प्रवाशांना येत्या सोमवार (दि. २५)पासून आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड देण्यात येणार आहे. मात्र रिफंड घेण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन रिफंड घेण्यास यावे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकिटाचा कालावधी हा ३० दिवसासाठी आहे. संबंधित रेल्वेचे आरक्षण तिकीट हे वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्या प्रवाशाला रेल्वेमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रवाशाने रेल्वे सुरू होण्यापूर्वीच आपले वेटिंग लिस्टमध्ये असलेले आरक्षण रद्द करून रिफंड घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करण्यास गेल्यावर त्यांना रिफंड मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशाचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्याने सुद्धा गाडी सुरू होण्यापूर्वीच आपले आरक्षण तिकीट रद्द करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिक