शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून रेल्वे देणार तिकीटाचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:04 IST

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात

ठळक मुद्देआरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणारविशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या भारतीय रेल्वेने येत्या एक जूनपासून देशात दोनशे श्रमिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेवून त्यासाठी आगावू तिकीट बुकींग सुरू केले असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, त्यातही फक्त परप्रांतिय प्रवाशीच प्रवास करू शकतील. या निमित्ताने रेल्वे आपल्या प्रवाशी वाहतुकीला प्रारंभ करीत असून, त्याच बरोबर दोन महिन्यांपुर्वी तिकीट आरक्षित केलेल्या परंतु रेल्वे रद्द झाल्याने प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे सोमवारपासून परत करण्यासही सुरूवात होत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात आरक्षण तिकिटाची रक्कम जमा केली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आरक्षण केंद्राच्या खिडकी वरून प्रत्यक्ष आरक्षण तिकीट घेतले होते, त्या प्रवाशांना येत्या सोमवार (दि. २५)पासून आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड देण्यात येणार आहे. मात्र रिफंड घेण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन रिफंड घेण्यास यावे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकिटाचा कालावधी हा ३० दिवसासाठी आहे. संबंधित रेल्वेचे आरक्षण तिकीट हे वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्या प्रवाशाला रेल्वेमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रवाशाने रेल्वे सुरू होण्यापूर्वीच आपले वेटिंग लिस्टमध्ये असलेले आरक्षण रद्द करून रिफंड घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करण्यास गेल्यावर त्यांना रिफंड मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशाचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्याने सुद्धा गाडी सुरू होण्यापूर्वीच आपले आरक्षण तिकीट रद्द करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

सोमवारपासून रेल्वे देणार तिकीटाचा परतावालोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या भारतीय रेल्वेने येत्या एक जूनपासून देशात दोनशे श्रमिक रेल्वे चालविण्याचा निर्णय घेवून त्यासाठी आगावू तिकीट बुकींग सुरू केले असून, त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष रेल्वेमध्ये फक्त तिकीट आरक्षित करणाऱ्यांनाच प्रवास करता येणार असून, त्यातही फक्त परप्रांतिय प्रवाशीच प्रवास करू शकतील. या निमित्ताने रेल्वे आपल्या प्रवाशी वाहतुकीला प्रारंभ करीत असून, त्याच बरोबर दोन महिन्यांपुर्वी तिकीट आरक्षित केलेल्या परंतु रेल्वे रद्द झाल्याने प्रवास न करू शकलेल्या प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे सोमवारपासून परत करण्यासही सुरूवात होत आहे.कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रवासी वाहतूक करणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या असून, ज्या प्रवाशांनी आॅनलाईन आरक्षण तिकीट घेतले होते. त्यांना आॅनलाईन आरक्षण रद्द केल्यावर त्यांच्या खात्यात आरक्षण तिकिटाची रक्कम जमा केली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी आरक्षण केंद्राच्या खिडकी वरून प्रत्यक्ष आरक्षण तिकीट घेतले होते, त्या प्रवाशांना येत्या सोमवार (दि. २५)पासून आरक्षण तिकीट रद्द केल्यानंतर रिफंड देण्यात येणार आहे. मात्र रिफंड घेण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरक्षण रिफंड देण्याचे काम दररोज सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी खबरदारी घेऊन रिफंड घेण्यास यावे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड स्पेशल रेल्वेचे आरक्षण तिकिटाचा कालावधी हा ३० दिवसासाठी आहे. संबंधित रेल्वेचे आरक्षण तिकीट हे वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्या प्रवाशाला रेल्वेमध्ये जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे प्रवाशाने रेल्वे सुरू होण्यापूर्वीच आपले वेटिंग लिस्टमध्ये असलेले आरक्षण रद्द करून रिफंड घेणे गरजेचे आहे. त्यानंतर मात्र प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करण्यास गेल्यावर त्यांना रिफंड मिळणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन आरक्षण तिकीट घेतलेल्या प्रवाशाचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर त्याने सुद्धा गाडी सुरू होण्यापूर्वीच आपले आरक्षण तिकीट रद्द करणे गरजेचे असल्याचे रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिक