शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना मिळाला परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:51 IST

महावितरणच्या नाशिक परिमंडळातील जवळपास २४ लाख वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर (अनामत रक्कम) ३३ कोटी २१ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला.

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळातील जवळपास २४ लाख वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर (अनामत रक्कम) ३३ कोटी २१ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला. यात नाशिक जिल्ह्यातील वीज ग्राहकांना २० कोटी २३ लाख रुपयांचा परतावा त्यांच्या वीज बिलातून मिळाला. वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.वीज कायद्यानुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव वसूल करण्याचे अधिकार महावितरणला देण्यात आले आहेत. ग्राहकांना पुरवठा केलेल्या विजेचे पैसे महावितरणकडे जमा होण्यास जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो.ही बाब लक्षात घेऊन कायद्यात सुरक्षा ठेवीची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत कायद्याच्या या तरतुदीतच वीज कंपनीने सुरक्षा ठेवीपोटी किती रक्कम आकारावी यासंदर्भात स्पष्ट नियम आहेत.गत आर्थिक वर्षातील (एप्रिल ते मार्च) ग्राहकाच्या एकूण वीज वापराची सरासरी काढून एक महिन्याचे बिल सुरक्षा ठेव म्हणून वसूल करण्यात येते. नवीन ग्राहकांसाठी तीन महिन्यांची सरासरी काढली जाते. उदा. एका ग्राहकाचा एकूण वार्षिक वीज वापर ३६०० रु पये असेल तर या ग्राहकाने सरासरीनुसार एका महिन्याचे बिल म्हणजेच ३०० रु पये सुरक्षा ठेवीपोटी महावितरणकडे भरणे बंधनकारक आहे. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात या ग्राहकाचा वार्षिक वीजवापर ४२०० रु पये झाल्यास ठरलेल्या सूत्रानुसार व सरासरीप्रमाणे सुरक्षा ठेवीची रक्कम ३५० रु पये होईल. संबंधित ग्राहकाचे ३०० रु पये पूर्वीच जमा असल्याने त्याला सुरक्षा ठेवीपोटी वीज कंपनीकडे फक्त ५० रुपये अतिरिक्त भरावे लागतील. सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा भरणा करण्यासाठी नियमित वीजबिलाशिवाय स्वतंत्र बिल ग्राहकाला दिले जाते.महावितरण सध्या ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर साडेदहा टक्के व्याज देत आहे. सुरक्षा ठेवीवर मिळणारे व्याज ग्राहकाच्या वीज बिलात निर्धारित महिन्यात जमा करण्यात येते. सर्वसाधारणपणे मे ते जून महिन्याच्या बिलात व्याजाची रक्कम ग्राहकाच्या बिलात जमा करण्यात येते. त्यामुळे संबंधित महिन्याच्या एकूण वीज बिलातून व्याजाची रक्कम कमी केली जाते. सध्या विविध बँका व वित्तीय संस्थांकडून ठेवीवर मिळणारा व्याजदर लक्षात घेता महावितरणच्या सुरक्षा ठेवीवर मिळणारा परतावा अधिक आहे. दरमहा येणाऱ्या वीज बिलात ग्राहकाची किती सुरक्षा ठेव जमा आहे, याचा तपशील देण्यात येतो.नाशिक परिमंडळात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात २३ लाख ९९ हजार ५०० ग्राहकांच्या सुमारे २९७ कोटी सुरक्षा ठेवीवर व्याजाच्या रूपाने २३ कोटी रुपयांचा परतावा त्यांच्या वीज बिलातून देण्यात आला. यात नाशिक जिल्ह्यातील १३ लाख ९८ हजार वीज ग्राहकांना १४ कोटी रु पयांचे व्याज मिळाले. तर गेल्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) परिमंडळातील ग्राहकांना त्यांच्या ३१५ कोटी रु पये सुरक्षा ठेवीवर ३३ कोटी २१ लाख रु पये व्याज मिळाले. यात नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांना २० कोटी २३ लाख रु पये व्याजाचा परतावा वीज बिलातून मिळाला.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक