रोपा अभावी्रकांदा लागवडीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 17:01 IST2019-12-27T16:37:31+5:302019-12-27T17:01:44+5:30
ओतुर :कळवण तालुक्यांतील कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या ओतुर परीसरात कांदा रोपाअभावी शेतकरी हतबल झाला असुन दरवर्षी पेक्षा या वर्षी उत्पादनात घट होणार आहे.

ओतुर परीसरातील शेतात होत असलेली उनहाळ कांद्याची लागवड.
या वर्षी सततचया पडणारया अवकाळी पावसामुळे तीन तीन टाकलेली लाल व उनहाळी कांदा रोपे खराब झाल्यामुळे रोपांची टंचाई सर्वत्रआहे त्यामुळे तयार पोरांचे भाव गगवाला भिडत आहेत त्यांच बरोबर रोपे रातरीतुन चोरीला जातआहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी नांदगाव व
मालेगाव परीसरातुन महागडी कांदा रोपे विकत आणली आहेत तेही अंदाजे एक एकर लागेल एवडे रोपाचे ५० ते६० हजार रु पये मोजावे लागत आहेत.
आहे.तसेच ढगाळ वातावरण व धुके यामुळे उरली सुरली रोपेही खराब होउन वाढ खुटंली आहे.महागडी बियाणे टाकुन रोपे कशी बशी तयार केली आहेत.
यावेळी रब्बीचे नियोजन पुरन पणे कोलमडलं असुन दरवर्षी पेक्षा कांदा लागवड एक महीना उशिरा होत आहे उरलेली रोपे लागवडीसाठी सर्वत्र लगबग
दिसुन येत आहे लागवडीसाठी बाहेर गावातुनमजुर आनलेजात आहेत खतांचया किमतीत वाढ झाली आहे असे असले तरी शेतकºयांनी हार न मानता गव्हा पेक्षा कांदा
परवडतो म्हणून महागडी रोपे आनुन लागवड करीत आहेत. सधा प्रत्येक शेतकºयाकडे भरपुर पाणी आहे.त्यामुळं उनहाळ कांद्यांचं पिक आरामात निघणयाची शक्यता आहे.
सधा रोप विक्र ेत्यांची चांदीच होत आहे सर्वत्र रोप रोप करत आहेत जयांचे कडे रोप आहे. ते सोशल मेडीयावर टाकतात लगेच एक दिवसात रोप विकले जाते सधा सर्वत्र कोणी कांद्यांचं रोप देता का रोप असा सुर
ऐकावयास मिळतो. त्यामुळे अगोदरच खरीप वाया गेलयने रबबी ची अशी परीस्थीती झाल्याने बळीराजाचे संपुर्ण वर्षाचे नियोजन कोलमडलं आहे सधा कांद्यास चांगले भाव असल्याने शेतकरीमहागडी रोपे विकत आणुन लागवड करीत आहेत.