महापालिकेत लवकरच भरती आयुक्तांचे सूतोवाच: पावसाळापूर्व कामांना सुरुवात
By Admin | Updated: May 24, 2014 00:23 IST2014-05-24T00:20:26+5:302014-05-24T00:23:09+5:30
नाशिक : महापालिकेत रिक्तपदांमुळे कर्मचार्यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन सुमारे दीड हजार मंजूरपदांसाठी भरती मोहीम राबविण्याचे सूतोवाच प्रभारी आयुक्तसंजीव कुमार यांनी केले आहे. एमकेसीएलसारख्या शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेची मदत घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

महापालिकेत लवकरच भरती आयुक्तांचे सूतोवाच: पावसाळापूर्व कामांना सुरुवात
नाशिक : महापालिकेत रिक्तपदांमुळे कर्मचार्यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन सुमारे दीड हजार मंजूरपदांसाठी भरती मोहीम राबविण्याचे सूतोवाच प्रभारी आयुक्तसंजीव कुमार यांनी केले आहे. एमकेसीएलसारख्या शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेची मदत घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
विविध नागरी कामांसंदर्भात मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी ही माहिती दिली. महापालिकेत यापूर्वी एक हजार पदे राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर भरतीप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला होता. कुणाल आयटी या पुण्याच्या संस्थेमार्फत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र मुलाखतीसाठी पात्र व्यक्तींना पत्र पाठविताना गोंधळ तसेच अन्य अनेक कारणांमुळे ही भरतीप्रक्रिया स्थगित करून रद्द करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर नव्याने भरतीप्रक्रिया राबविण्याचा ठराव करण्यात आला. परंतु अद्याप ही प्रक्रिया राबविली गेलेली नाही. आता भरतीबाबत आढावा घेऊन भरती करता येऊ शकेल असे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेने या पूर्वी भरतीप्रक्रियेसाठी काढलेल्या जाहिरातीत सुमारे दोनशे अभियंता, दीडशे वैद्यकीय अधिकारी आणि सहाशे लिपिक अशा पदांसाठी ही भरती होणार होती.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने शहरात पावसाळापूर्व कामांना प्रारंभ झाला आहे. नाले सफाईची ५३ आणि झोपडपीतील ६४ अशा ११७ कामांना सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयुक्त संजीव कुमार आणि शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली. या कामांसाठी दोन कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. झोपडपीत उघडे नाले आणि गटारी आहेत ते स्वच्छ करण्यात येत आहे.
शहरात गरजेनुसार टॅँकरने पाणी
शहरात पाणीटंचाईच्या तक्रारी होत असल्या तरी महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ज्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होईल तेथे महापालिकेच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. सध्या पालिकेकडे सहा टॅँकर आहेत.
३५ घंटागाड्यांची लवकरच खरेदी
महासभेने ३५ घंटागाड्यांच्या खरेदीस मान्यता दिल्यानंतर देखील खरेदीची कारवाई केली जात नसल्याची तक्रार मनसेने केली. परंतु आचारसंहितेमुळे खरेदी रखडली होती. लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) रमेश पवार यांनी सांगितले.