शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

दुष्काळग्रस्तांसाठी ८५ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:41 AM

नाशिक : अपुऱ्या व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने दुसºया टप्प्यातील ८५ कोटी रुपये सोमवारी उपलब्ध करून दिले.

ठळक मुद्दे७३ कोटींचे वाटप : अजून अडीचशे कोटींची प्रतीक्षा

नाशिक : अपुऱ्या व कमी पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके हातची गेलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना शासनाची आर्थिक मदत मिळणार असून, त्यासाठी मागणी केलेल्या सव्वाचारशे कोटी रुपयांपैकी शासनाने दुसºया टप्प्यातील ८५ कोटी रुपये सोमवारी उपलब्ध करून दिले.पहिल्या टप्प्यात शासनाने दिलेल्या ८५ कोटींपैकी ७३ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यात जमा झाले असून, दुसºया टप्प्यातील निधीही आता समसमान तालुक्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकºयांच्या हातून पाण्याअभावी खरिपाची पिके गेली. संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८२ टक्के पर्जन्यमान नोंदविले गेले. त्यामुळे मालेगाव, नांदगाव, सिन्नर, चांदवड, देवळा, बागलाण, नाशिक, इगतपुरी या आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्या सारखी परिस्थिती राज्यातही निर्माण झाल्याने राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. त्याचबरोबर केंद्र सरकारने राज्याला मदत करावी यासाठी अहवाल पाठविला. (पान ७ वर)या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यासाठी काही मदत जाहीर केली असली तरी, त्यानुसार जिल्ह्णातील शेतकºयांची संख्या लक्षात घेता, जिल्ह्णासाठी ४२६ कोटी ७८ लाख ५६ हजार १५१ रुपयांची मदतीची गरज असून, तसा प्रस्तावही शासनाकडे रवाना केला त्यापोटी शासनाने गेल्या आठवड्यात ८५ कोटी २६ लाख ३३ हजार ६० रुपयांची मदत पाठविली असून, आठही तालुक्यांमध्ये सुमारे ७३ कोटींचे वाटप एका आठवड्यात करण्यात आले आहे. दुसºया टप्प्यातही शासनाने ८५ कोटी रुपये दिले असून, अशा पद्धतीने १७० कोटी रुपये जिल्ह्णाला प्राप्त झाले आहेत. नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांतील ५ लाख ४१ हजार २५७ शेतकºयांच्या चार लाख ८० हजार ६६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर केला. शासनाने मे २०१३ मध्ये घेतलेल्या नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीच्या निर्णयाप्रमाणे कोरडवाहू शेतकºयाला प्रती हेक्टरी ६८०० याप्रमाणे दोन हेक्टरप्रमाणे, तर बागाईती पिकासाठी १३,५०० रुपये हेक्टरी दोन हेक्टरपर्यंत व फळबागासाठी १८००० रुपये निश्चित केले आहेत.