शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

संधी नाकारले गेलेले कुठे कमी पडले, हा खरा प्रश्न!

By किरण अग्रवाल | Updated: January 12, 2020 02:09 IST

भाजपच्या नाशिक शहराध्यक्षपदावरील निवड बिनविरोध झाली असली तरी, त्यानिमित्ताने प्रदर्शित जुन्या-जाणत्यांची नाराजी पक्षात ‘आलबेल’ नसल्याचेच सुचवून जाणारी ठरली आहे. त्यामुळे नूतन शहराध्यक्षांना या स्थितीचा सामना करीत महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून पक्षाचा प्रभाव कायम राखणे कसोटीचेच ठरणार आहे.

ठळक मुद्देभाजप शहराध्यक्षांची निवड बिनविरोध नाराजी दुर्लक्षिता न येणारीसारेच राजकीय पक्ष अलीकडे संघटनात्मक पातळीवर नवनवीन बदल स्वीकारताना दिसत आहेत.

सारांश

पक्ष कोणताही असो, आणि तो सत्तेवर असो अगर नसो; प्रामाणिक कार्यकर्त्याच्या वाट्याला सन्मान वा संधी अभावानेच येत असते. पक्षकार्य करून अगर सतरंज्या उचलून पक्षाच्या वाढ विस्तारासाठी झोकून देणारे कार्यकर्ते आता दुर्मीळ होत आहेत ते त्यामुळेच. बरे, सत्तेत असतानाच्या मलईदार संधीचे सोडा; विरोधी बाकावर असलेल्या पक्षांच्या संघटनात्मक निवडीतही कार्यकर्त्यांची उपेक्षाच घडून येते तेव्हा पाण्याखाली आगीची स्थिती आकारास आल्याखेरीज राहात नाही. नाशिक भाजप शहराध्यक्ष निवडीलाही ही अशीच पार्श्वभूमी लाभली असल्याने ती दुर्लक्षिता येऊ नये.

काळाशी सुसंगतता राखत सारेच राजकीय पक्ष अलीकडे संघटनात्मक पातळीवर नवनवीन बदल स्वीकारताना दिसत आहेत. हा बदल केवळ कार्यालयीन अवस्था व व्यवस्थांच्या बाबतीतच होतो आहे असे नाही, तर मनुष्यबळाच्या पातळीवरही त्यात गरजेनुसार व्यावसायिकता आलेली दिसत आहे. घरच्या भाकरी खाऊन पक्षकार्य करण्याचे दिवस सरलेत, आता पगारी सेवक ठेवून कामकाज चालविण्याची वेळ आली आहे. कार्यकर्ते हे पक्षाचे कमी आणि नेत्याची पालखी उचलणारे अधिक झाले त्यामुळे ही वेळ आली हे खरे; पण वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही कसली संधी वाट्याला न येण्याच्या अनुभवामुळेही निष्ठावान कार्यकर्ते दुरावत चालल्याचे चित्र आहे. कोणताही पक्ष याला अपवाद नाही. दुर्दैव असे की, कालपर्यंत केलेल्या कामकाजाचा विचार न करता आजच्या हिशेबाने उपयोगितामूल्य लक्षात घेऊन निष्ठावानांना थांबविले जाते त्यामुळे नाराजीची वा धुसफुशीची बीजे अंकुरतात. यात सक्षमतेच्या निकषावर पात्र ठरणाऱ्यांनाही संधी नाकारली जाते, तेव्हा त्याचे शल्य संबंधिताला तर बोचणारे ठरतेच, शिवाय त्या पक्षालाही नुकसानदायीच ठरते. नाशिक भाजप शहराध्यक्षाच्या निवडी-निमित्ताने असेच शल्य अनेकांच्या नशिबी आले आहे.

राज्यातील सत्तेच्या पाटावरून उठावे लागले असले तरी, नाशिक महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आहे. शहरात तीन आमदार आहेत, त्यामुळे नाही म्हटले तरी या पक्षाच्या शहराध्यक्षपदाला वेगळाच मान आहे. या मानासोबत येणाºया जबाबदारीचे भानही महत्त्वाचे असल्याने या पदावरील नियुक्तीकडे सर्वांच्या नजरा लागून असणे स्वाभाविक होते. सुमारे दीड डझन इच्छुक त्यासाठी स्पर्धेत असल्याने उत्सुकतेत भर पडून गेली होती. परंतु गत आवर्तनातील काळजीवाहू अध्यक्षांना पुरेसा कालावधी लाभला नाही या कारणाने त्यांचीच फेरनिवड केली गेल्याने अन्य इच्छुकांचा हिरमोड घडून आला. अर्थात, एका पदावर एकाचीच निवड होत असल्याने इतरांची नाराजी येतेच; पण ती येताना आमचे काय चुकले, अथवा आम्ही कुठे कमी पडलो, असा प्रश्न केला जातो तेव्हा या नाराजीकडे दुर्लक्ष करता येऊ नये.

मुळात भाजप राज्याच्या सत्तेत असतानाही निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्याच्या वाट्याला फारशा संधी आल्या नाहीत याची सल अनेकांना अजून बोचते आहे. नाशिक महापालिकेतही सत्ता आली; पण त्याचे वाटेकरी अधिकतर इतर पक्षातून आलेलेच बनलेत. अशात किमान पक्ष-संघटनात्मक जबाबदारीची संधी तरी आजवर सातत्याने उपेक्षित राहिलेल्यांना लाभावी, अशी अपेक्षा होती; परंतु तसे न घडल्याने नाराजी प्रदर्शिली गेली. विशेषत: बाळासाहेब सानप यांच्यानंतर हंगामी निवड करताना जातकारण डोळ्यासमोर ठेवून गिरीश पालवे यांची निवड केली गेल्याचा आरोप होत होता. आता त्यांची फेरनिवड होतानाही तोच धागा पुढे आला, त्यामुळे ‘त्या’ निकषातही बसणाऱ्यांकडून आम्ही कुठे कमी पडलोचा प्रश्न केला जाणे स्वाभाविक ठरले. यातली दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यात पक्षाला विरोधात बसण्याची वेळ आली आहे. स्थानिक महापालिकेत सत्ता असली तरी महाविकास आघाडीमुळे ती सुखेनैव पार पडण्याची चिन्हे नाहीत. पोटनिवडणुकीत हातची जागा गमवावी लागल्याचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. अशावेळी पक्षाला खंबीर व स्वयंप्रज्ञेच्या नेतृत्वाची गरज आहे. पालवे यांना ते स्वातंत्र्य लाभू दिले जाणार आहे का, हा यातील खरा प्रश्न आहे. पदावर न राहताही आपले अजेंडे राबवून पक्ष आपल्या काखोटीला बांधू पाहणाºयांकडूनच प्रबळ इच्छुकांना बाजूला ठेवले गेल्याची भावना दबकी असली तरी बोलकी ठरणारी आहे. त्यामुळेच, वरकरणी सदर निवड बिनविरोध घडविण्यात यश लाभले असले तरी, सुप्त नाराजी निपटून कारभार करणे हे नूतन अध्यक्षांसाठीही आव्हानाचेच ठरले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNashikनाशिक