शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

रेशन दुकानदार  देणार  विधानभवनाला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 2:47 PM

मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

ठळक मुद्देमेळावे, बैठका : रेशन दुकानदारांच्या मोर्चाची जय्यत तयारी १९ मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

नाशिक : राज्यातील रेशन दुकानदारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही सरकार दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व परवानाधारक तसेच हॉकर्स, किरकोळ केरोसिन परवानाधारकांचा येत्या १९ मार्च रोजी काढण्यात येणा-या मोर्चाची जोरदार तयारी जिल्ह्यात सुरू झाली असून, संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांनी विभागीय, जिल्हा व तालुकानिहाय रेशन दुकानदारांच्या बैठका, मेळावे घेवून वातावरण निर्मिती केली जात आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्यात यासाठी विधानभवनालाच वेढा मारण्याची तयारी रेशन दुकानदारांनी केली आहे.या संदर्भात कळवण येथे मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. सार्वजनिक वितरण प्रणालीत भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी सरकारी यंत्रणा नेहमीच करत असल्याने ते टाळण्यासाठी राज्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकान परवाना धारकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावे, न्या. डी. पी. वधवा समितीने दिलेल्या अहवालानुसार परवानाधारकांना ५६००० रूपये मासिक वेतन द्यावे, तसेच वाढलेल्या महागाईनुसार फरकाची रक्कमही मिळावी, केरोसिनचा कोटा कपात केल्यामुळे विक्रेत्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत असून, शासनाने राज्यातील हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवानाधारकांचे पुनवर्सन करून त्यांना मानधन देण्यात यावे, केरोसिन परवाना धारकांना अनुदानित गॅस वितरणाचे पुर्ण कामकाज देण्यात यावे, शासनाने राज्यात शिधापत्रिकाधारकांना कोठेही कुठल्याही रास्त धान्य दुकानात धान्य मिळावे म्हणून पोर्टबिलीटीची योजना सुरू केली आहे. त्यामुळे परवानाधारकांवर अन्याय होणार असून, शाासनाने कमीशन वाढ करूनही त्याचा फायदा होणार नाही. ही योजना युद्धपातळीवर राबविणार असेल तर परवानाधारकांना वेतनश्रेणी, शासकीय कर्मचाºयाचादर्जा प्राप्त करून देण्यात यावा आदी मागण्यांसाठी १९ मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या ११ मार्च रोजी वर्धा येथे राज्यस्तरीय बैठक घेवून त्यात रणनीती ठरविली जाणार आहे. या मेळाव्यास पुण्याचे शहाजी लोखंडे, सोलापुरचे बाबुराव ममाने, जळगावचे जमनादास भाटीया, नगरचे देवीदास देसाई, गणपत डोळसे पाटील, प्रविण जैन, निवृत्ती कापसे, गिरीष कुलकर्णी, परशुरामअहिरे, सुभाष शिरोडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक