पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:46+5:302021-09-13T04:14:46+5:30
चौकट- बदाम १०० रुपयांनी स्वस्त अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुकामेव्याच्या आवकेवर काहीसा परिणाम झाल्याने मध्यंतरी बदामाचे दर दुपटीने वाढले ...

पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले
चौकट-
बदाम १०० रुपयांनी स्वस्त
अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुकामेव्याच्या आवकेवर काहीसा परिणाम झाल्याने मध्यंतरी बदामाचे दर दुपटीने वाढले होते. या सप्ताहात त्यात किलोमागे ५० ते १०० रुपयांची घसरण झाली आहे. डाळींचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
चौकट-
टमाटा ७.५० रुपये किलो
बाजार समितीत टमाट्याची आवक टिकून असून घाऊक बाजारात टमाटा सर्वसाधारणपणे ७.५० रुपये किलो विकला जात आहे. वांगी दर वाढले असून कमीत कमी दहा तर सर्वसाधारणपणे १९ रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे.
चौकट-
मोसंबी ३५ रु. किलो
नाशिक बाजार समितीत शनिवारी ७० क्विंटल मोसंबीची आवक झाली होती. मोसंबीला २५ ते ३५ रुपये दर मिळाला आरक्ता डाळिंब सरासरी ३७.५० रुपये किलो दराने विकले गेले.
कोट-
किराणा बाजारात सध्या ग्राहकी कमी असल्याने मालाला उठाव कमी आहे. मध्यंतरी वाढलेले दर सध्या स्थिर असून तेलाचे दरही काही प्रमाणात उतरले आहे. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट-
सतत पाऊस असल्यामुळे शेतातून भाजीपाला काढता येत नाही. यामुळे नुकसान होत आहे. भाजीपाला पिकविणारे शेतकरी यावर्षी पूर्णपणे अडचणीत आले आहे. कोणत्याही मालाला चांगला दर मिळत नसल्याने खर्चही निघत नाही- परसराम रसाळ, शेतकरी
कोट-
कोरोना संकटामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. यावेळी गॅस सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरखर्च वाढला आहे. शासनाने किमती कमी कराव्यात - अंजली पवार, गृहिणी