शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

जंगली झुडुपांची पडणार भर : ‘वनराई’त नाशिककर साजरा करणार वृक्षांचा ‘बर्थ-डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:58 IST

येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे.

ठळक मुद्देझाडांना ‘गिफ्ट’ देण्याचे आवाहनसंवर्धनासाठी जिद्दीने उपाययोजना करण्यावर ‘फोकस’

नाशिक : ‘जागतिक पर्यावरण दिन’ अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांनी वेगवेगळे उपक्रमांचे नियोजन केले आहेत. त्यापैकी एक आपलं पर्यावरण संस्था. ही संस्था मागील पंधरा वर्षांपासून शहर व परिसरात वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करत आहेत. या संस्थेने गेल्या चार ते पाच वर्षांपासून शहरात दरवर्षी पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत आगळा वेगळा ‘वनमहोत्सव’ साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे नाशिककरांमध्ये वृक्ष लागवड, संवर्धनाविषयीची जनजागृती तर होतच आहे; मात्र पर्यावरण संवर्धनाची आवडही निर्माण होत आहे. येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी नाशिककर पुन्हा सज्ज झाले आहेत.आपलं पर्यावरण संस्थेने शहरात २०१५ साली सातपूर येथील वनविभागाच्या जागेत नाशिक पश्चिम वनविभागाच्या परवानगीने व पुढाकाराने ‘नाशिक देवराई’ संकल्पना राबविण्याचे ठरविले. येथील सुबाभूळ, ग्लिरिसिडीयाचे मृत जंगल जीवंत करण्याचे मोठे आव्हान या संस्थेने स्विकारले. फाशीचा डोंगर या नावाने ओळखली जाणारी ही जागा आता ‘नाशिक देवराई’ म्हणून नावारूपाला आली आहे. येथे अकरा हजार भारतीय प्रजातीची रोपांची दमदार वाढ झाली असून गेल्या वर्षीय दुर्मीळ रानवेलींची लागवड या ठिकाणी करण्यात आली होती. याच धर्तीवर म्हसरूळ येथील वनविभागाच्या जागेत संस्थेने सहा हजार झाडांची लागवड २०१६ साली करून वनमहोत्सव साजरा केला. या ठिकाणी ‘नाशिक वनराई’ विकसीत करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न आहे. यंदा वनराईमध्ये भर टाकली जाणार आहे, ती म्हणजे दुर्मीळ अशा २५ ते ३० प्रजातीच्या जंगली झुडुपांची. या प्रजातींची सुमारे सहाशेहून अधिक रोपांची लागवड पर्यावरणदिनाच्या औचित्यावर केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी दिली. संस्थेचे हे दोन्ही प्रकल्प यशस्वी झाले असून वैयक्तिक गायकवाड हे याबाबत लक्ष देऊन आपल्या हरित सैनिकांच्या मदतीने त्यासाठी प्रयत्नशील आहेत. वृक्ष संवर्धन करताना बदलत्या ऋुतुचक्रानुसार येणाऱ्या विविध अडचणी नवनवीन आव्हानांचा सामना करत त्यांची टीम संयम बाळगून रोपांच्या संवर्धनासाठी जिद्दीने उपाययोजना करण्यावर ‘फोकस’ करत आहेत.केवळ वृक्षारोपण करून लावलेली वृक्ष वा-यावर सोडून देणे हा या संस्थेचा मुळीच उद्देश नाही, तर लावलेली रोपे जगणार कशी आणि त्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर कसे होईल, यादृष्टीने संस्थेचे सर्व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवडीमागे जैवविविधतेची जोपासना हा मुख्य उद्देश आहे. विविध प्रकारच्या किटकांपासून पक्ष्यांपर्यंत आणि प्राण्यांपर्यंत जैवविविधता जोपासली जावी, या दृष्टीने रोपांची लागवड आणि संगोपनावर संस्थेकडून भर दिला जात आहे. भविष्यात हे दोन्ही प्रकल्प निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींकरिता अभ्यासाचे सुसज्ज असे केंद्र व्हावे, असा मानस गायकवाड यांनी बोलून दाखविला.झाडांना ‘गिफ्ट’ देण्याचे आवाहनयेत्या बुधवारी साजरा होणाºया वनमहोत्सवांतर्गत नाशिककरांनी वनराईवर हजेरी लावताना आपल्या लाडक्या झाडांना न विसरता त्यांच्या गरजेचे ‘गिफ्ट’ आणण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. ‘गिफ्ट’ची कल्पनाही अत्यंत भन्नाट आहे, ती म्हणजे येताना पाच लिटर पाण्याचे कॅन अन् शक्य झाल्यास गांडुळ किंवा कंपोस्ट खताची लहानशी बॅग.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरणforest departmentवनविभाग