शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवा म्हणतो, मला एक चानस हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:29 IST

त्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.

वसंत तिवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसºया सप्ताहात त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत जंगलातील कैºया, करवंदे, मोहाची फुले, तोरणे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्र्यंबकेश्वरच्या दक्षिण-पश्चिमेस तसेच उत्तर बाजूला घनदाट जंगल असून, मुबलक प्रमाणात निसर्गाच्या कृपादृष्टीने रानमेव्याने लगडलेली दाट झाडी आहेत. त्यात करवंदच्या काटेरी जाळ्या, मोहाचे अवाढव्य असलेले झाड, त्या झाडाखाली मोहाच्या पडलेल्या पांढºया पण गुंगी येईल अशा फुलांचा सडा, तर काही रायवळ समजली जाणारी कैऱ्यांचे घड असलेली आंब्याची झाडे, महिना दीड महिन्यात येणारी जांभळे व चिंचाचा बहर तर जानेवारी-फेब्रुवारीमध्येच आला आहे. गावठी चॉकलेट रंगाचे आवळे रस्त्यावर वाटे घालून बसलेल्या रानमेव्याच्या विक्रेत्यांभोवती कडे करून वाटसरू खरेदी करताना दिसतात. विशेषत: उन्हाळ्यात सर्वांनाच आंबट खाण्याचा मोह होतो. कैºयांचा लसणी मिरची व मीठ टाकून केलेला ठेचा जेवणाची निश्चितच गोडी वाढवतो.कच्च्या करवंदाचे लोणचे, भाजी, आवळ्याचे अनेक पाचक गुण असलेला मोरावळा, मुरांबा, आवळा कँडी यांनी अधिक पसंती असते. मोठ्या हॉटेल्समध्ये करवंदाच्या लोणच्याला चांगली मागणी असते. मोहाच्या फुलालाही मागणी असते.-----------लॉकडाउनमुळे वाढल्या चिंतादिवाळी संपल्यानंतर त्र्यंबकेश्वरला स्थलांतर होत असते. वैशाख ज्येष्ठात खरीप हंगाम सुरू होतो. रोप तयार करण्यासाठी जमीन भाजणी सुरू होते; पण तोपर्यंत दोन पैसे गाठीला असावेत म्हणून अनेक कुटुंबे शहरात स्थलांतर करून दोन पैसे कमावतात; पण यावर्षी लोकांचे गणित चुकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे कामच बंद पडले. हाती पैसे नसल्याने लागवडीची चिंता. दररोजच्या पोटापाण्यासाठी रानमेवा विकून जेवणाची भूक भागविली जाते. आता लॉकडाउनमुळे तेही शक्य नसल्याने या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक