शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

रानमेवा म्हणतो, मला एक चानस हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:29 IST

त्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.

वसंत तिवडे ।लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : येत्या आठ-दहा दिवसांत त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या आदिवासी परिसरातील रानमेवा बाजारपेठेत दाखल होण्याचे संकेत असले तरी सध्या कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात रानमेव्याचे आगमन लांबण्याची शक्यता वाढली आहे. कधी एकदा लॉकडाउन संपतो आणि रानमेवा बाजारात विक्रीस आणतो, अशी अधीरता वाढली असून, काही काळ शिथिलता मिळण्याची प्रतीक्षा विक्रेते करत आहेत.एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसºया सप्ताहात त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत जंगलातील कैºया, करवंदे, मोहाची फुले, तोरणे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात. त्र्यंबकेश्वरच्या दक्षिण-पश्चिमेस तसेच उत्तर बाजूला घनदाट जंगल असून, मुबलक प्रमाणात निसर्गाच्या कृपादृष्टीने रानमेव्याने लगडलेली दाट झाडी आहेत. त्यात करवंदच्या काटेरी जाळ्या, मोहाचे अवाढव्य असलेले झाड, त्या झाडाखाली मोहाच्या पडलेल्या पांढºया पण गुंगी येईल अशा फुलांचा सडा, तर काही रायवळ समजली जाणारी कैऱ्यांचे घड असलेली आंब्याची झाडे, महिना दीड महिन्यात येणारी जांभळे व चिंचाचा बहर तर जानेवारी-फेब्रुवारीमध्येच आला आहे. गावठी चॉकलेट रंगाचे आवळे रस्त्यावर वाटे घालून बसलेल्या रानमेव्याच्या विक्रेत्यांभोवती कडे करून वाटसरू खरेदी करताना दिसतात. विशेषत: उन्हाळ्यात सर्वांनाच आंबट खाण्याचा मोह होतो. कैºयांचा लसणी मिरची व मीठ टाकून केलेला ठेचा जेवणाची निश्चितच गोडी वाढवतो.कच्च्या करवंदाचे लोणचे, भाजी, आवळ्याचे अनेक पाचक गुण असलेला मोरावळा, मुरांबा, आवळा कँडी यांनी अधिक पसंती असते. मोठ्या हॉटेल्समध्ये करवंदाच्या लोणच्याला चांगली मागणी असते. मोहाच्या फुलालाही मागणी असते.-----------लॉकडाउनमुळे वाढल्या चिंतादिवाळी संपल्यानंतर त्र्यंबकेश्वरला स्थलांतर होत असते. वैशाख ज्येष्ठात खरीप हंगाम सुरू होतो. रोप तयार करण्यासाठी जमीन भाजणी सुरू होते; पण तोपर्यंत दोन पैसे गाठीला असावेत म्हणून अनेक कुटुंबे शहरात स्थलांतर करून दोन पैसे कमावतात; पण यावर्षी लोकांचे गणित चुकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्यामुळे कामच बंद पडले. हाती पैसे नसल्याने लागवडीची चिंता. दररोजच्या पोटापाण्यासाठी रानमेवा विकून जेवणाची भूक भागविली जाते. आता लॉकडाउनमुळे तेही शक्य नसल्याने या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक