शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राणे, राणा आणि आता राज म्हणजे आरआरआर चित्रपटच: छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 01:22 IST

राज्यातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी साऱ्यांचीच असून, कोणताही धर्म, जातीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काहींना नोटिसा बजावल्या होत्या. तरी देखील जाणीवपूर्वक काही विधाने केली जात असतील तर पोलीस कायदेशीर मार्गाने कारवाई करतीलच. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चुकीचे बोलले त्यांना अटकेला सामोरे जावे लागले, त्यानंतर राणा हे तर खासदार, आमदार राहिलेेले त्यांनीही कायदा मोडला अटकेला सामोरे जावे लागले आणि राज ठाकरे त्यामुळे हे तिघे म्हणजे आरआरआर चित्रपटच आहे काय? असे वाटू लागल्याची टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

ठळक मुद्देठाकरेंवर कायद्यानेच कारवाई होईल

नाशिक : राज्यातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची जबाबदारी साऱ्यांचीच असून, कोणताही धर्म, जातीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काहींना नोटिसा बजावल्या होत्या. तरी देखील जाणीवपूर्वक काही विधाने केली जात असतील तर पोलीस कायदेशीर मार्गाने कारवाई करतीलच. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चुकीचे बोलले त्यांना अटकेला सामोरे जावे लागले, त्यानंतर राणा हे तर खासदार, आमदार राहिलेेले त्यांनीही कायदा मोडला अटकेला सामोरे जावे लागले आणि राज ठाकरे त्यामुळे हे तिघे म्हणजे आरआरआर चित्रपटच आहे काय? असे वाटू लागल्याची टीका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना भुजबळ म्हणाले, ‘कोणत्याही धर्माचे सण, उत्सव आले की पोलीस खबरदारीची उपाययोजना म्हणून अगोदरपासूनच तयार असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी औरंगाबादेत अतिशय अग्रेसिव्हपणे भाषण केले, त्यातून धार्मिक तेढ निर्माण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी कायदेशीर सल्लामसलत करूनच त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे दोषी आहेत की कसे, हे न्यायपालिका ठरवेल; परंतु कायद्यापुढे सारे समान असून, आपल्या बोलण्याने पुढे काय परिणाम होईल, याची जाणीव त्यांनाही असल्याने त्यांनीही तशी तयारी करून ठेवली असेल, असेही भुजबळ म्हणाले. राज्यापुढे बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, पाण्यासारखे अनेक प्रश्न महत्त्वाचे असून, अशा वेळी साऱ्यांनीच काळजीपूर्वक वागणे गरजेचे आहे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळRaj Thackerayराज ठाकरे