शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

आचारसंहिता संपली; आता कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:56 IST

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या,

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली कामे, रखडलेल्या शासकीय योजनांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात येऊन कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींचीही धावपळ उडणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, आदिवासी आयुक्त कार्यालय ते सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम झाला होता. कोणत्याही नवीन कामांना मंजुरी बंद करण्यात आली, त्याचबरोबर व्यक्तिगत व सार्वजनिक लाभाच्या योजनांनाही थंड बस्त्यात बांधून ठेवण्यात आले. मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य वर्ज्य करण्यात आल्यामुळे कामे ठप्प झाली होती. चालू वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता जारी असल्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडली होती. लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच प्रशासनाने नवीन कामांची घाई सुरू करताच, पुन्हा दोनच महिन्यांत निवडणूक आचारसंहितेचे सावट विकासकामांवर आले. साधारणत: दीड महिने विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. जिल्हा नियोजन समितीने यंदा कोट्यवधी रुपयांची तरतूद विकासकामांसाठी करून ठेवली असून, निवडणूक आचारसंहितेमुळे वर्षातील पाच महिने कोणतेही कामकाज शासकीय यंत्रणेला करता आलेले नाही. त्यामुळे आगामी पाच महिन्यांत शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे त्याचबरोबर अपूर्ण कामे, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची कसोटी लागणार आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आणल्याचे पत्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले होते. मात्र त्यांनी ३० आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येत असल्याचे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले आहे. आयोगाचे पत्र प्राप्त होताच, शासकीय कार्यालयातील विकासकामांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीदेखील मतदारसंघातील पूर्ण, अपूर्ण तसेच नवीन कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद