शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर देशसेवा करणाऱ्या जवानांचे रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 19:01 IST

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी सैनिकांच्या हातावर राखी बांधून त्यांचे औक्षण केले.

ठळक मुद्देपाडळी : पाताळेश्वर विद्यालयाचा २५ वर्षांपासून उपक्रम

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी सैनिकांच्या हातावर राखी बांधून त्यांचे औक्षण केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. सुमंतकाका गुजराथी यांच्या प्रेरणेतून विद्यालयातील विद्यार्थिनी स्वत:च्या प्रेरणेने राख्या जमा करून सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवितात. आतापर्यंत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एक लाख राख्या पाठविल्या आहेत. प्रत्येक वर्षी पाडळी, आशापूर, ठाणगाव, हिवरे, पिंपळे, टोळेवस्ती, बोगीरवाडी, पलाट व ठाकरवाडी परिसरातील सीमेवर लढणारे जवान यांना बोलावून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावर्षी दशरथ मधुकर पाटोळे, नितीन सुकदेव पाटोळे, संतोष भीमा पाटोळे, विजय रंजन पालवे, सूरज विष्णू जाधव, संदीप शंकर पाटोळे, वैभव बाळासाहेब रेवगडे या जवानांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. जे जवान भारतीय सीमेवर अहोरात्र आपल्यासाठी झटतात व देशाचे रक्षण करतात त्यांच्या प्रती प्रेमभावना व्यक्त करणे व आपण सर्वांनी प्रेरणा घेऊ असे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी माजी सरपंच चंद्रभान रेवगडे यांनी मनोगत व्यक्त केले. जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. आपण सर्वांनी महिलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेलूया असे आवाहन केले.या जवानांनी आम्ही देश रक्षणासाठी व आमच्या बांधवांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू असा संदेश दिला व आम्ही सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळते ते या आमच्या भगिनींचे व आम्हाला शिकविणाऱ्या गुरुजनांचे असल्याचे सांगितले. आतापर्यंत विद्यालयातील व परिसरातील दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी देश रक्षणासाठी सीमेवर लढतात ही विद्यालयासाठी भूषणाची बाब असल्याचे सांगितले. या जवानांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते. 

 

टॅग्स :IndiaभारतSocialसामाजिक