शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सीमेवर देशसेवा करणाऱ्या जवानांचे रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 19:01 IST

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी सैनिकांच्या हातावर राखी बांधून त्यांचे औक्षण केले.

ठळक मुद्देपाडळी : पाताळेश्वर विद्यालयाचा २५ वर्षांपासून उपक्रम

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सीमेवर लढणाऱ्या जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही जवानांना विद्यालयात बोलावून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. विद्यार्थिनींनी सैनिकांच्या हातावर राखी बांधून त्यांचे औक्षण केले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. सुमंतकाका गुजराथी यांच्या प्रेरणेतून विद्यालयातील विद्यार्थिनी स्वत:च्या प्रेरणेने राख्या जमा करून सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठवितात. आतापर्यंत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एक लाख राख्या पाठविल्या आहेत. प्रत्येक वर्षी पाडळी, आशापूर, ठाणगाव, हिवरे, पिंपळे, टोळेवस्ती, बोगीरवाडी, पलाट व ठाकरवाडी परिसरातील सीमेवर लढणारे जवान यांना बोलावून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावर्षी दशरथ मधुकर पाटोळे, नितीन सुकदेव पाटोळे, संतोष भीमा पाटोळे, विजय रंजन पालवे, सूरज विष्णू जाधव, संदीप शंकर पाटोळे, वैभव बाळासाहेब रेवगडे या जवानांना विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. जे जवान भारतीय सीमेवर अहोरात्र आपल्यासाठी झटतात व देशाचे रक्षण करतात त्यांच्या प्रती प्रेमभावना व्यक्त करणे व आपण सर्वांनी प्रेरणा घेऊ असे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी माजी सरपंच चंद्रभान रेवगडे यांनी मनोगत व्यक्त केले. जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. आपण सर्वांनी महिलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेलूया असे आवाहन केले.या जवानांनी आम्ही देश रक्षणासाठी व आमच्या बांधवांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू असा संदेश दिला व आम्ही सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळते ते या आमच्या भगिनींचे व आम्हाला शिकविणाऱ्या गुरुजनांचे असल्याचे सांगितले. आतापर्यंत विद्यालयातील व परिसरातील दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी देश रक्षणासाठी सीमेवर लढतात ही विद्यालयासाठी भूषणाची बाब असल्याचे सांगितले. या जवानांनी विद्यालयातील विद्यार्थिनींना भेटवस्तू दिल्या. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते. 

 

टॅग्स :IndiaभारतSocialसामाजिक