शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

राखी पोहोचू न शकल्याने माहेरवाशिणींना हुरहुर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:11 AM

पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही.

नाशिक : पश्चिम महाराष्टत आठवडाभर महापुराने थैमान घातल्याने कोल्हापूर आणि सांगलीच्या अनेक माहेरवाशिणींना यंदाच्या रक्षाबंधनाने वेगळीच हुरहुर लावली आहे. काहींनी यंदा पाठवलेली राखीच अद्याप मिळालेली नाही. तर काहींच्या माहेरच्या घराचे बरेच नुकसान झाल्याने तिथे अजूनही घरांची साफसफाई आणि डागडुजीच सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाला तिकडे जाणेच शक्य न झाल्याने नेहमीप्रमाणे रक्षाबंधनाला भावाला राखी बांधता येणार नसल्याची खंत नाशिकच्या अनेक भगिनींना वाटत आहे.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या परिघात आलेल्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. अनेक घरांची वाताहत तर कुणाच्या घरांची पडझड झाली. त्याशिवाय आॅगस्टच्या प्रारंभापासून त्या भागात वाहने जाणेच ठप्प झाले. तसेच टपाल खात्याने पाठवलेले पत्र, कुरिअरमार्फत पाठवलेल्या राख्यादेखील पोहोचू शकल्या नसल्याचे नाशिकमधील भगिनींनी सांगितले. त्यामुळे यंदा आम्ही केवळ मोबाइलवर बोलूनच रक्षाबंधनाचा सण साजरा करणार असल्याची भावनादेखील कोल्हापूर किंवा सांगलीत माहेर आणि नाशिकला सासर किंवा कुटुंबासह निवास करीत असलेल्या भगिनींनी बोलून दाखवली.दरवर्षी रक्षाबंधनाला मी माहेरी जाऊन सण साजरा करते. मात्र, यंदा पुराच्या घटनेमुळे रक्षाबंधनाला माहेरी जाऊन भावाला राखी बांधता आली नाही. तसेच आई-वडील आणि भावाच्या कुटुंबासह सगळ्यांनी मिळून सण साजरा करण्याच्या आनंदालादेखील मुकले आहे. त्यांना पाठवलेली राखीदेखील पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे आता गुरुवारी भावाशी मोबाइलवर बोलूनच यंदाच्या रक्षाबंधनात समाधान मानावे लागेल.- अनुराधा किरण जाधव,  कडेगावमी मूळची सांगलीची असले तरी आमचे घर पुराच्या टप्प्यापासून थोडेसे दूर होते. त्यामुळे मीच आठवडाभर सांगलीत राहून माझ्या माहेरच्या घरातून पूरग्रस्तांची सेवा केली. त्यांना आमच्या युवा मंचच्या वतीने धान्य, जेवण, कपडे पुरवण्याचे कार्य करीत होते. मात्र, आठवड्यापेक्षा जास्त कालावधी तिकडेच राहिल्याने परवाच नाशिकला परतले. मला सख्खा भाऊ नाही. पण दरवर्षी गावातील अन्य भावांना राखी बांधते. ते यंदा शक्य नसल्याची खंत आहे.- सोनिया होळकर, सांगलीमनाची प्रचंड घालमेल सुरू आहे. अथक प्रयत्नांनंतर माझी राखी एका कुरियर कंपनीने पोहोचविण्याची जबाबदारी घेतली, मात्र ती राखी रक्षाबंधनाला भावापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचेही सांगितले गेले आहे. त्यामुळे जेव्हा कोल्हापूरस्थित भावाला राखी मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थाने रक्षाबंधन साजरा होईल. आम्हा दोघी बहिणींचा एकुलता एक मोठा भाऊ आहे, मात्र यंदाच्या रक्षाबंधनाला दोघींची राखी पोहोचणे अशक्य आहे, त्यामुळे फोनवरच भावाशी संवाद साधून शुभेच्छा देणार आहे.- पौर्णिमा चौगुले, उपआयुक्त नाशिकपोलीस दलात असल्यामुळे मी यापूर्वी कुरियरनेच सांगलीस्थित भावाकडे राखी पाठवत असायचे. यावर्षी पूरपरिस्थितीमुळे तो पर्यायही बंद झाला आहे. नैसर्गिक आपत्तीपुढे आपण हतबल आहोत, त्यामुळे भावनांना आवर घालत भावाला फोनवरूनच रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊन संवाद साधावा लागणार आहे. भाऊ-बहिणीचे नाते हे अतूट प्रेमाचे नाते मानले जाते. त्यामुळे मनात कुठेतरी सल जाणवत आहे.- शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणमी मागील २८ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे. दरवर्षी भावाला कुरियरद्वारे राखी पाठवत असते, मात्र यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूरमध्ये राहणाºया भावाकडे राखी पाठविण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे. पोलीस दलात सेवा बजावताना भावनांना आवर घालण्याचा धडा मिळालेला आहे. कोल्हापूरस्थित माझ्या काही मैत्रिणींशी मी संपर्क साधला असून, त्या माझ्या वतीने राखी खरेदी करून भावापर्यंत पोहोचविणार आहे.- नम्रता देसाई,पोलीस निरीक्षक, नाशिक

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनfloodपूर